दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गेची निवड

 काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गेची निवड





काँग्रेस अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शशी थरूर यांचा दारूण पराभव झाला आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे हे विजयी झाले असून ते काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत.17 ऑक्टोबरला झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीमध्ये 9385 जणांनी मतदान केले होते. यातील 416 मते बाद झाली होती. खर्गे यांना 7897 मते मिळाली तर थरूर यांना 1072 मते मिळाली.


काँग्रेस अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी म्हणजेच 19 ऑक्टोबरला पार पडली. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतमोजणीचा निकाल दुपारी 4 पर्यंत जाहीर करण्यात येईल असं सांगितलं जात होतं मात्र हा निकाल दुपारी दीडच्या सुमारासच स्पष्ट झाला. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर शशी थरुर यांच्या गटाचे सलमान सोज यांनी निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला. सोज यांनी केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या मतदानात गडबड झाल्याचा सोज यांनी आरोप केला होता आणि उत्तर प्रदेशातील सर्व मते अवैध ठरवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....