प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-स्त्रियांवरील अत्याचारा प्रमाणेच पुरुषांवरील अत्याचारास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यांची गरज_ अँड. शुभांगी गीत्ते

 स्त्रियांवरील अत्याचारा प्रमाणेच पुरुषांवरील अत्याचारास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यांची गरज_ अँड. शुभांगी गीत्ते



परळी वैजनाथ : येथील नवगण महाविद्यालयामध्ये आयोजित महिला तक्रार निवारण समितीच्या कार्यक्रमात बोलताना परळी न्यायालयातील एडवोकेट शुभांगी गीते ह्या बोलत होत्या. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की आजच्या धावपळीच्या जगामध्ये महिलावर अन्याय अत्याचार होतात त्यांचा विविध माध्यमातून विविध पद्धतीने लैंगिक छळ होतो त्यास प्रतिबंध करणारे कायदे आहेत  तसेच आता परिस्थिती पुरुषांवर लैंगिक छळाची वेळ येण्याची देखील आली आहे त्यामुळे पुरुषांनाही आपले संरक्षण करण्यासाठी कायद्याने योग्य ती कलमे आणि उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी नोंदवले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ एम जी राजपांगे हे होते तर प्रा एस आर जोशी, प्रा अफीया उजम, प्रा. मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ राजपांगे यांनी मुला मुलींमध्ये होत असलेल्या मोबाईलच्या अतिवापराचा आणि त्याच्या दुरुपयोगाचा उल्लेख करून संस्कारी पिढी निर्माण करणे हे शिक्षकांचे व पालकांपुढील आव्हान असल्याचे मत नोंदविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ. अर्चना परदेशी यांनी केले तर आभार गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ वंदना फटाले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्राध्यापक वृंदांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या