प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-नगर परिषदेने मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावण्याची गरज

 वैद्यनाथ दर्शनाला येणाऱ्या बाहेरगावच्या भाविकांना बसतोय 'चकवा'

 सोमवारी रात्री यात्रेकरूंची एक ट्रॅव्हल्स गणेशपार रोडवर आल्याने धांदल उडाली.अरुंद रस्त्यावरून वाट काढत ही गाडी मंदिराकडे रवाना झाली.
----------------------------------------------------------


नगर परिषदेने  मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावण्याची गरज 


 परळी वैजनाथ - देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथे प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून भाविक येत असतात. परंतु शहरात प्रवेश केल्यावर वैद्यनाथ मंदिर नेमके कोणत्या दिशेला आहे याचा याची माहिती नसल्याने अनेक वाहने थेट गाव भागात वाट चुकत आहेत,परिणामी त्यांना अरुंद रस्त्यावरून मार्ग काढत वैजनाथ मंदिर गाठावे लागत आहे. सोमवारी रात्री यात्रेकरूंची एक ट्रॅव्हल्स गणेशपार रोडवर आल्याने धांदल उडाली.कशीबशी ही गाडी मंदिराकडे रवाना झाली.


नगर परिषदेने शहराच्या विविध भागात मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे गरजेचे झालेले आहे. मुख्यतः शहरात असलेल्या मौलाना अब्दुल कलाम चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि उड्डाणपूल परिसरात दिशादर्शक फलक नसल्याने यात्रेकरू भाविक मंदिराकडे जाण्याचा मार्ग चुकत आहेत. दरम्यान काही ठिकाणी संस्थांकडून फलक लावलेले आहेत.  नगरपालिकेने वैद्यनाथ मंदिर मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तात्काळ दिशादर्शक फलक लावणे गरजेचे झाले आहे.


- मुख्य रस्त्यावरचे अतिक्रमणही ठरत आहे भाविकांना अडचण -


शहरात प्रवेश केल्यावर बीड गंगाखेड अंबाजोगाई रस्त्यावरून येणाऱ्या भाविकांना विनाकारण उभे असणाऱ्या वाहनांचा सामना करावा लागतो. या अतिक्रमणामुळे भाविकांना मंदिराची वाट एक प्रकारे कठीणच होऊन बसते. उड्डाणपूल परिसर, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, नेहरू चौक (तळ परिसर) या भागात होणाऱ्या अनाधिकृत वाहनांच्या पार्किंगमुळे वैद्यनाथाच्या दर्शनाला येणारे भाविक बेजार होतात.या अतिक्रमणाकडे वाहतूक पोलीस आणि नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या