परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-संत ,महंतांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण

 अपघातात ठार झालेल्या वारकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत द्या----- बब्रुवान शेंडगे


 वडवणी (प्रतिनिधी):- कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथील वारकरी कार्तिकी यात्रेचे निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पायी दिंडीत पाठीमागून येत असलेली टाटा नेक्सन कार घुसत्यांनी दिंडीतील सहा वारकरी जागीच ठार झाली तर  उपचार चालू असताना एका वारकऱ्याचे निधन झाले अशी एकूण सात भाविक ठार झाली असून यात एका चिमुकल्याचही समावेश आहे,ही दुर्दैवी घटना  31 ऑक्टोंबर रोजी घडले आहे, वारकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मयतांच्या वारसांना 5 लाख रुपये व जखमींना 50 हजार रुपये तात्काळ आर्थिक मदत द्या अशी मागणी  जगद्गुरु संत तुकाराम महाराज सामाजिक आर्थिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बब्रुवान शेंडगे पाटील यांनी केली आहे.

       जठारवाडी ता. करवीर जिल्हा कोल्हापूर येथील वारकरी कार्तिक यात्रेच्या निमित्ताने पंढरपूरला पायी  जात असताना भरधाव वेगात असलेली कार दिंडीत घुसली यात सहा वारकरी जागीच ठार झाले तर एका वारकऱ्यावर उपचार सुरू असताना आपले प्राण गमावावे लागले, या मृतामध्ये एका चिमुकल्याचा  समावेश आहे, ही दुर्दैव घटना 31 ऑक्टोंबर रोजी घडले असून मतांमध्ये पाच महिला, एक पुरुष व एक मुलगा यांचा समावेश आहे, या भीषण अपघातात आणखीन पाच वारकरी गंभीर  जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती फक्त होत आहे ,अपघातात ठार झालेल्या वारकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत द्या अशी मागणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बब्रुवान शेंडगे पाटील यांनी केले असून या संदर्भात बोलताना ते म्हणाले की वारकऱ्यांच्या संदर्भात शासनाने आजवर कधीच गांभीर्याने घेतले नाही, महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे, येथे  शेकडो दिंड्या निघतात, हिंदू धर्म जोपासणाऱ्या वापरकर्त्यांना शासनाचे कवच मिळाले पाहीजे, आपण स्वतः जातीने मुख्यमंत्री यांची भेट घेणार असून त्यांना वारकऱ्यांना मदत करण्यासाठी विनंती करणार असुन, मृत वारकऱ्यांच्या वारसांना व जखमींना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत  मिळवुन देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार  असे ते म्हणाले.

संत ,महंतांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण

----------------------------------------------------

पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला ,भीषण अपघातात ठार झालेल्या वारकऱ्यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज सामाजिक व आध्यात्मिक प्रतिष्ठानच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, यावेळी अमृत आश्रम स्वामी नवगण राजुरी, लक्ष्‍मण महाराज मेंगडे, चैतन्य महाराज कबीर आळंदी देवाची, पंडित महाराज क्षीरसागर आळंदी देवाची, ह भ प बाळासाहेब मोहिते पाटील परभणी , जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे बब्रुवांनजी शेंडगे, ह भ प सुनील महाराज पारगावकर ,दिनूभाऊ शेंडगे, पुरुषोत्तम महाराज कोठुळे ,शिवाजीराव मस्के, बाबासाहेब फपाळ सह प्रतिष्ठांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!