इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एका नव्या वादाच्या भोवऱ्यात

 पायात चपला घालून हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली !



राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एका नव्या वादाच्या भोवऱ्यात



वादात राहिलेले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आता पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. आज 26/11 दहशतवादी हल्ल्या निमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना पायात चपला घालून त्यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटले आहे.



26/11 या दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने मुंबईत विविध ठिकाणी श्रद्धांजलीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमांमध्ये हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पायात चपला घालून श्रद्धांजली देताना दिसून आले.


26/11 या दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने मुंबईत विविध ठिकाणी श्रद्धांजलीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमांमध्ये हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पायात चपला घालून श्रद्धांजली देताना दिसून आले.


विशेष म्हणजे या कार्यक्रमात त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा उपस्थित होते. या सर्वांनी चपला काढून हुतात्म्याना श्रद्धांजली वाहिली. परंतु, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चपला घालून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पित केली. यावरून आता पुन्हा एकदा राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!