इमेज
  परळीत थार गाडीचा थरार : गाडीची धडक एका युवकाचा मृत्यू ! सीसीटीव्हीत घटना कैद, मध्यरात्री गाडी आणि आरोपी घेतला ताब्यात परळी वैजनाथ | एमबी न्यूज वृत्तसेवा....     परळी वैजनाथ येथे प्रशांत प्रल्हाद देशमुख या युवकाला एका थार गाडीने संत भगवान बाबा चौक ते तहसील कडे जाणाऱ्या रस्त्यावर धडक देऊन चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची गंभीर घटना समोर आली. या घटनेत प्रशांत देशमुख यांना गंभीर अवस्थेतअंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी परळी पोलिसांनी मध्यरात्रीनंतर संबंधित थार गाडी व आरोपीला ताब्यात घेतले आहे.        या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून देशमुख कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित थार गाडी स्पष्टपणे दिसत आहे. फुटेजमध्ये चारचाकी वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने मागून गाडी आणून धडक दिल्याचे दिसत असून या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम...

MB NEWS-मुंबई येथील आघाडीच्या 17 डिसेंबर रोजी आयोजित हल्लाबोल मोर्चात सामील व्हा-दीपक सिरसाट

 मुंबई येथील आघाडीच्या 17 डिसेंबर रोजी  आयोजित हल्लाबोल मोर्चात सामील व्हा-दीपक सिरसाट




*परळी वैजनाथ (प्रतिनिधी)*


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे नेते  हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अशा महापुरुषाबद्दल अपमानजनक वक्तव्य करुन गरळ ओकत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमाप्रकरणाबाबत व मुंबई येथील धारावी झोपडपट्टी अदानी यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. या विषयाचा विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने दिनांक 17 डिसेंबर रोजी हल्लाबोल आांदोलन मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामील व्हावे असे आवाहन काँगे्रसचे नेते दीपक सिरसाट यांनी केले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार दिनांक 17  डिसेंबर 2022 रोजी काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा सकाळी 11.30 वाजता जिजामाता उद्यान (राणीचा बाग) बायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई पर्यंत असणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील काँग्रेसपक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जुन सामील व्हावे. राज्याचे राज्यपाल भगत कोश्यारी व भाजपनेते सातत्याने महापुरुषाबद्दल अपमानजनक वक्तव्य करीत आहे. राज्यातील सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना कर्नाटक राज्यात जाण्याबाबत सरकार उघडपणे भुमिका घेत आहे. हे दुर्दैवी असून दुसरीकडे धारावी झोपडपट्टी उध्दवस्त करुन ती जागा उद्योगपती मित्र आदानी यांच्या घश्यात घालत आहे. त्यामुळे परिसरात 10 लोक लोक विस्थापीत होणार असल्यामुळे महाविकास  सरकार विरुध्द हल्लाबोल आंदोलन मोर्चा काढत आहे. यामध्ये सामील होण्याचे आवाहन काँगे्रसचे नेते अनु .जाती.विभाग.परळी शहर अध्यक्ष दीपक सिरसाट यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या