प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

 परळी शहरासाठी येणारा करोडो रुपयाचा निधी सीमा वासियांसाठी खर्च करण्यात यावा



 संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी


परळी वै. (प्रतिनिधी) 

 शहारासाठी मागच्या काही वर्षांमध्ये कोटीवधी रुपये निधी  आला. पण तो निधी कुठे खर्च झाला..? त्या निधीपासून परळीचा काय विकास झाला..? हा एक संशोधनाचा भाग असून परळी साठी यापुढे निधी न देता तो निधी सीमा भागातील मराठी लोकांसाठी व तिथल्या सुख सुविधेसाठी खर्च करण्यात यावा. अशी पत्राद्वारे  संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद चालू असून हा वाद जास्तीत जास्त विकास निधीच्या अनुषंगाने त्या भागातील सुख सुविधाच्या अनुषंगानेच होत आहे. 



    अशा परिस्थितीत परळीला मागच्या काही वर्षांमध्ये कोट्यवधीचा निधी आला पण तो योग्य ठिकाणी न वापर करता त्याचा भ्रष्टाचार, बोगस काम आणि दोन पाच टक्के लोकांना कार्यकर्त्यांना जगण्यासाठीच तो निधी वापरण्यात आला असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केला आहे. यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परळी शहारा साठी यापुढे निधी देताना विचार करावा व तो निधी सीमाभागातील लोकांना देण्यात यावा. असे आव्हान सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.



.   सध्या परळीच्या भागात बघितले असेल तर भ्रष्ट करभारा शिवाय सर्वसामान्यांचे हित व दूरदृष्टी नसलेले राज्यकर्ते परळीला लाभले असून यामुळे या भागाला जेवढं प्रसिद्धीच्या माध्यमातून परळीचे नाव आहे. तेवढं या भागामध्ये जर आपण डोकावून बघितले तर कुठल्याही प्रकारची सुख सुविधा इथल्या राज्यकर्त्यांनी केलेली नाही. म्हणून यापुढे परळीला निधी न देता तो सीमा वासियांसाठी खर्च करण्यात यावा असे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या