परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

 परळी शहरासाठी येणारा करोडो रुपयाचा निधी सीमा वासियांसाठी खर्च करण्यात यावा



 संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी


परळी वै. (प्रतिनिधी) 

 शहारासाठी मागच्या काही वर्षांमध्ये कोटीवधी रुपये निधी  आला. पण तो निधी कुठे खर्च झाला..? त्या निधीपासून परळीचा काय विकास झाला..? हा एक संशोधनाचा भाग असून परळी साठी यापुढे निधी न देता तो निधी सीमा भागातील मराठी लोकांसाठी व तिथल्या सुख सुविधेसाठी खर्च करण्यात यावा. अशी पत्राद्वारे  संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद चालू असून हा वाद जास्तीत जास्त विकास निधीच्या अनुषंगाने त्या भागातील सुख सुविधाच्या अनुषंगानेच होत आहे. 



    अशा परिस्थितीत परळीला मागच्या काही वर्षांमध्ये कोट्यवधीचा निधी आला पण तो योग्य ठिकाणी न वापर करता त्याचा भ्रष्टाचार, बोगस काम आणि दोन पाच टक्के लोकांना कार्यकर्त्यांना जगण्यासाठीच तो निधी वापरण्यात आला असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केला आहे. यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परळी शहारा साठी यापुढे निधी देताना विचार करावा व तो निधी सीमाभागातील लोकांना देण्यात यावा. असे आव्हान सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.



.   सध्या परळीच्या भागात बघितले असेल तर भ्रष्ट करभारा शिवाय सर्वसामान्यांचे हित व दूरदृष्टी नसलेले राज्यकर्ते परळीला लाभले असून यामुळे या भागाला जेवढं प्रसिद्धीच्या माध्यमातून परळीचे नाव आहे. तेवढं या भागामध्ये जर आपण डोकावून बघितले तर कुठल्याही प्रकारची सुख सुविधा इथल्या राज्यकर्त्यांनी केलेली नाही. म्हणून यापुढे परळीला निधी न देता तो सीमा वासियांसाठी खर्च करण्यात यावा असे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!