प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला पोलिसांनी कारसह क्रेननं उचललं; वातावरण तापलं

 🅾️ मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला पोलिसांनी कारसह क्रेननं उचललं; वातावरण तापलं





हैदराबाद: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिणीची कार हैदराबाद पोलिसांनी क्रेननं उचलली आहे. विशेष म्हणजे जगन यांची बहिण वायएसआरटीपीच्या प्रमुख शर्मिला रेड्डी कारमध्ये असताना हा संपूर्ण प्रकार घडला. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी शर्मिला रेड्डी गेल्या होत्या. त्यावेळी हा प्रकार घडला.


हैदराबादमधील सोमाजीगुडा परिसरात संपूर्ण घटना घडली. शर्मिला रेड्डींनी केसीआर यांच्या घराला घेराव घालण्याची घोषणा केली होती. आंदोलन करत असलेल्या शर्मिला यांना ताब्यात घेण्यातचा प्रयत्न पोलिसांनी केला. पोलिसांनी त्यांना १ किलोमीटर आधीच रोखलं. शर्मिला रेड्डी स्वत:चं एसयूव्ही कार चालवत होत्या.



पोलिसांनी कार थांबवल्यानंतर शर्मिला यांनी कार आतून लॉक केली. पोलिसांनी लॉक तोडण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी कार टो केली. शर्मिला रेड्डी आंध्र प्रदेशच्या जगन मोहन रेड्डी यांच्या भगिनी आहेत. त्यांचे वडील वाय एस राजशेखर रेड्डी अविभाजित आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. जुलै २०२१ मध्ये रेड्डी यांनी वायएसआर तेलंगणा पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली.



एक दिवसापूर्वीच अज्ञातांनी शर्मिला यांच्यावर हल्ला केला होता. त्यांच्याविरोधात शर्मिला गो बॅक अशा घोषणा दिल्या. घोषणाबाजी करणाऱ्यांनी ज्वलनशील पदार्थ टाकून बस पेटवली. त्यावेळी बसमध्ये २० जण होते. ते वेळीच खाली उतरले. त्यामुळे अनर्थ टळला. शर्मिला कार्यकर्त्यांसोबत नरसम्पेटा येथे जेवणासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या