इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:पौळ पिंपरीच्या सरपंच पदाचा माणिकराव पौळ यांनी स्विकारला पदभार गणेश आबा पौळ यांची एकमताने उपसरपंच पदी निवड

 पौळ पिंपरीच्या सरपंच पदाचा माणिकराव पौळ यांनी स्विकारला पदभार


गणेश आबा पौळ यांची एकमताने उपसरपंच पदी निवड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

पौळ पिंपरी ग्रामपंचायत निवडणूक २०२२ मध्ये सरपंच पदासाठी माणिकराव पौळ हे बहुमताने विजयी  झाले होते, त्यांनी निवडून आल्यानंतर शुक्रवार दि.३० रोजी आपल्या पदाचा पदभार घेतला. याचवेळी झालेल्या उपसरपंच निवडीच्या बैठकीत एकमताने गणेश आबा पौळ यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.


राज्याचे माजी मंत्री आ.धनंजय मुंडे व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मीक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून पौळ पिंपरी ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. २०२२ च्या झालेल्या निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवत प्रचंड बहुमताने ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना निवडून दिले. जनतेतून झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत माणिकराव पौळ हे बहुमताने विजयी झाले तर पॅनलचे एकूण ११ पैकी सात उमेदवार विजयी झाले.


शुक्रवारी झालेल्या बैठकीत सरपंच माणिकराव पौळ यांनी पदभार घेतला. तर शांत, संयमी आणि सात्विक व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वपरिचित असलेले गणेश आबा पौळ यांची उपसरपंच पदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, ज्येष्ठ नेते बबन अप्पा पौळ, पांडुरंग काळे, वसंत राठोड यांच्यासह अनेकांनी त्यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट