परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली माहिती

 ‘यूजीसी’चा महत्त्वपूर्ण निर्णय; चार वर्षांची पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना आता थेट ‘पी.एच.डी’ करता येणार



विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली माहिती

यूजीसीकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. चार वर्षांची पदवीपूर्ण असलेले विद्यार्थ्यांना आता थेट पीएच.डी साठी प्रवेश घेता येणार आहे. अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली आहे.



“पीटीआयने यूजीसीच्या हवाल्याने सांगितले की, चार वर्षांचा कार्यक्रम पूर्णत: अंमलात येईपर्यंत तीन वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम बंद केले जाणार आहेत.”




पदवीपूर्व शिक्षण तसेच संशोधन आणि पीएचडी अभ्यासक्रम अधिक सक्षम करण्यासाठी यूजीसी मार्गदर्शन तत्वे जाहीर करण्यची योजना आखत आहे.

Click:*पहा:- ■ वारकऱ्यांच्या विरोधानंतर सुषमा अंधारेची पत्रकार परिषद.| नेेमकं काय दिलं स्पष्टीकरण.* #mbnews #subscribe #like #share #comments

पीएचडी प्रवेशासाठी पात्रता निकष बदलले?
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पीएचडी प्रवेशासाठी असलेले पात्रता निकष बदलण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार आता पदवीनंतर थेट पीएचडीसाठी प्रवेश घेता येणार आहे. त्यासाठी आता पदव्युत्तर पदवीची अट आवश्यकता राहणार नाही. मात्र, यासाठीही युजीसीकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत. चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के गुण किंवा समतुल्य सीजीपीए असल्यास थेट पीएचडीसाठी प्रवेश घेता येणार आहे.

Click &watch:*⭕...... म्हणून रिझर्व्ह बँकेने बीड जिल्ह्यात बंद केलाय १० रुपयांच्या नोटांचा पुरवठा.* #mbnews #subscribe #like #share #comments




ज्यांनी चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमानंतर पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला आहे. त्यांनाही पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला पीएसडीसाठी प्रवेश मिळणार आहे. मात्र, तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुणांसह दोन वर्षीय पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतरच पीएचडीसाठी प्रवेश मिळेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!