इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS-विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली माहिती

 ‘यूजीसी’चा महत्त्वपूर्ण निर्णय; चार वर्षांची पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना आता थेट ‘पी.एच.डी’ करता येणार



विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली माहिती

यूजीसीकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. चार वर्षांची पदवीपूर्ण असलेले विद्यार्थ्यांना आता थेट पीएच.डी साठी प्रवेश घेता येणार आहे. अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली आहे.



“पीटीआयने यूजीसीच्या हवाल्याने सांगितले की, चार वर्षांचा कार्यक्रम पूर्णत: अंमलात येईपर्यंत तीन वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम बंद केले जाणार आहेत.”




पदवीपूर्व शिक्षण तसेच संशोधन आणि पीएचडी अभ्यासक्रम अधिक सक्षम करण्यासाठी यूजीसी मार्गदर्शन तत्वे जाहीर करण्यची योजना आखत आहे.

Click:*पहा:- ■ वारकऱ्यांच्या विरोधानंतर सुषमा अंधारेची पत्रकार परिषद.| नेेमकं काय दिलं स्पष्टीकरण.* #mbnews #subscribe #like #share #comments

पीएचडी प्रवेशासाठी पात्रता निकष बदलले?
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पीएचडी प्रवेशासाठी असलेले पात्रता निकष बदलण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार आता पदवीनंतर थेट पीएचडीसाठी प्रवेश घेता येणार आहे. त्यासाठी आता पदव्युत्तर पदवीची अट आवश्यकता राहणार नाही. मात्र, यासाठीही युजीसीकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत. चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के गुण किंवा समतुल्य सीजीपीए असल्यास थेट पीएचडीसाठी प्रवेश घेता येणार आहे.

Click &watch:*⭕...... म्हणून रिझर्व्ह बँकेने बीड जिल्ह्यात बंद केलाय १० रुपयांच्या नोटांचा पुरवठा.* #mbnews #subscribe #like #share #comments




ज्यांनी चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमानंतर पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला आहे. त्यांनाही पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला पीएसडीसाठी प्रवेश मिळणार आहे. मात्र, तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुणांसह दोन वर्षीय पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतरच पीएचडीसाठी प्रवेश मिळेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....