प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-केजरीवालांच्या पराभवालाही विजयाची किनार; 'आप' बनला नववा राष्ट्रीय पक्ष, केवळ घोषणा बाकी

 केजरीवालांच्या पराभवालाही विजयाची किनार; 'आप' बनला नववा राष्ट्रीय पक्ष, केवळ घोषणा बाकी





नवी दिल्‍ली;वृत्‍तसेवा : दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्‍वाखालील आम आदमी पार्टीला दुहेरी फायदा झाला आहे. भलेही आम आदमी पार्टी जरी आज (गुरूवार) गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात मागे पडल्‍याची दिसली तरी. ज्‍यावरून दोन्हीही राज्‍यात पक्षाचा पराभव होणार हे नक्‍की आहे. असे असतानाही दुसऱ्या बाजुला आम आदमी पार्टीने मैलाचा दगड ठरेल असे यश संपादन केले आहे. आपने राष्‍ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त केला आहे. ज्‍यानंतर देशात राष्‍ट्रीय पक्षांची संख्या वाढून नऊ इतकी होणार आहे.

आम आदमी पक्षाने गुजरातच्या निवडणुकीमध्ये १३ टक्‍के मते मिळवली आहेत. त्‍यामुळे आप हा गुजरातमध्ये स्‍थानिक पक्ष आणि राष्‍ट्रीय पक्ष बनला आहे. याची घोषणा नंतर निवडणूक आयोगाकडून केली जाईल.


Click:● *ग्रामपंचायत निवडणुक: परळी तालुक्यातील अशी आहे स्थिती | फायनल आकडेवारी* #mbnews #subscribe #like #share #comments





त्‍यातच एक दिवस आधी आम आदमी पार्टीने दिल्‍ली महापालिकेत विजय संपादित केला. आपने या निवडणुकीत (बुधवारी) १३४ जागा जिंकत भाजपच्या १५ वर्षाच्या एकहाती सत्‍तेला पराभूत केले. मनपाच्या २५० वार्डांच्या झालेल्‍या निवडणुकीत भाजपला १०४ जागांवर विजय मिळाला. तर काँग्रेसच्या वाट्याला फक्‍त नऊ जागा आल्‍या.




देशात राजकीय पक्ष किती आहेत? 

निवडणूक आयोगाच्या अनुसार काँग्रेस, भाजप, तृणमूल काँग्रेस, एनसीपी, सीपीआय आणि एनपीपी हे राष्‍ट्रीय पक्ष आहेत. एनपीपीला राष्‍ट्रीय पक्षाचा दर्जा २०१९ मध्ये मिळाला. आम आदमी पार्टीने दिल्‍ली, पंजाब आणि गोव्यात राज्‍य स्‍तरावरील पक्ष म्‍हणजे स्‍थानिक पक्षाचा दर्जा मिळवला आहे.

राष्‍ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी यातील एक अट पूर्ण करणे जरूरीचे.. 

• चार राज्‍यात प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळालेला हवा.
-तीन राज्यांतून मिळून लोकसभेच्या तीन टक्के जागा जिंकायला हव्यात.
-लोकसभेच्या चार जागांव्यतिरिक्त, संसदीय किंवा विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये 6% मते मिळविलेली हवीत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या