इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:ऊसाच्या ट्रॉलीवर कार धडकली ! तिघांचा दुर्दैवी मृत्यू !

 ऊसाच्या ट्रॉलीवर कार धडकली ! तिघांचा दुर्दैवी मृत्यू

 


अंबाजोगाई- रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला कारची धडक लागून झालेल्या अपघातात रेनापुर येथील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.मृतांमध्ये बबन राठोड,नंदू राठोड,राहुल मुंडे यांचा समावेश आहे.

अंबाजोगाई-लातूर महामार्गावर बीड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या दोन पदरी रस्ता लागताच कार चालकाला समोरील ऊसाचा ट्रॅलीला रेडिएम नसल्याने ती न दिसल्यामुळे ट्रॅलीच्या खाली कार घुसल्याचा अंदाज आहे. या घडलेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की, कारची समोरील बाजू चेंदामेंदा झाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अंबाजोगाई लातूर महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा झाला आहे.विशेषतः सध्या साखर कारखाने सुरू असल्याने दिवसरात्र उसाची वाहतूक सुरू असते,त्यामुळे रहदारीस अडथळा तर होतोच पण रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रक,ट्रॅक्टर मुळे मोठ्या प्रमाणावर अपघात देखील होत आहे.

टिप्पण्या

  1. त्यामुळे रेडियम रिफ्लेक्टर ट्रक व ट्रॉली च्या पुढे व पाठीमागे लावावे, जेणेकरून रात्री अपघात होणार नाहीत.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या