इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:सरपंचाला आता दोन मतांचा अधिकार

 सरपंचाला आता  दोन मतांचा अधिकार




थेट निवडणुकीतून निवडून आलेल्या सरपंचाला आता उपसरपंच निवडीत दोन मतांचा अधिकार प्राप्त झाला असल्याने एकाच गटातील दोन इच्छुकां पैकी आता ते अधिकचे मत कुणाला मिळेल ! तोच उपसरपंचपदी विराजमान होणार आहे.

सरपंच पदाच्या खालोखाल उपसरपंच पद प्रतिष्ठेचे समजले जाते त्यामुळे आता उपसरपंच पदाच्या तडजोडी आणि घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आता होणाऱ्या उपसरपंचाच्या निवडी संदर्भात ग्राम विकास विभाग दि. ३० सप्टेंबर२०२२ महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम ३३ नुसार उपसरपंच यांच्या निवडणूकीची प्रक्रीया याची माहिती देण्यात आली आहे.

उपसरपंच पदाच्या निवडणूकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंच यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. उपसरपंच पदाच्या निवडणूकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. उपसरपंचाची निवडणूक ही सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेणे व उपसरपंच यांची निवड करणे कायद्याने बंधनकारक आहे. उपसरपंच पदाची निवडणूकीची सभा तहकुब झाल्यास मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम १९६४ च्या नियम १२ मधील तरतुदीनुसार सदरची सभा त्या कारणासाठी दुसऱ्याच दिवशी तात्काळ घेण्यात यावी. उपसरपंचाच्या निवडणूकीकरीता अपरिहार्य कारणास्तव सरपंच अनुपस्थित असतील तर जिल्हाधिकारी यांनी अनुपस्थितीच्या कारणाची खातरजमा करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ चे कलम ३३ मधील पोट कलम ६ (४) मधील तरतुदीस अनुसरुन तात्काळ पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करावी. जेणे करुन विहित कालावधीमध्ये पंचायतीचे गठन होणे शक्य होईल. असे सूचित करण्यात आले आहे त्या संदर्भात कक्ष अधिकारी सुनील माळी यांची स्वाक्षरी आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या