इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:●महाराष्ट्र विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न

 ◆संस्कृतीच्या नावावर महिलांवर दबाब : प्रा.डॉ.शैलजा बरुरे

●महाराष्ट्र विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न




परळी / प्रतिनिधी


महिलाना दबाब,दरारा,भीती दाखवून दिली जाणारी वागणूक याला संस्कृती,संस्कार असे विचार समाजात रुजविण्यात येत असून महिलांनी समाजात मुक्त संचार केलं तरच समाजाची प्रगती होऊ शकेल असे मत प्रा.डॉ.शैलजा बरुरे यांनी व्यक्त केले.


परळी तालुक्यातील महाराष्ट्र प्राथ,माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनानिमित्त आयोजित माता-पालक मेळाव्यास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.संस्थेचे जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख हे अध्यक्ष म्हणून तर संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे, संचालक सुदाम शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.


पुढे बोलताना प्रा.डॉ.बरुरे मॅडम म्हणाले की ,आज आपण जे काही सुख उपभोगतो आहोत ते केवळ आपल्या महापुरुषांनी केलेल्या प्रयत्नामुळे शक्य झाले आहे.शिक्षण समजला दिशा दाखविण्याचे काम करते म्हणून सावित्रीबाईनी मुलींची पहिली शाळा सुरू केली मात्र आता काळ बदलला आहे.शिक्षणामुळे प्रश्न विचारणारा समाज निर्माण होऊ नये यासाठी आजच्या व्यवस्थेने शिक्षण क्षेत्राला बाजाराचे स्वरूप देऊन गोरगरिबांना शिक्षणापासून वंचीत ठेण्याचा प्रयत्न सुरू आहे.तेव्हा प्रत्येक आईने आज किमान आपल्या मुलांसाठी सावित्रीबाई होणे गरजेचे आहे असे सांगितले.तर संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे यांनी शिक्षण पद्धतीबद्दल माहिती देत छ.शाहू महाराज,कर्मवीर भाऊराव पाटील,फुले दांपत्य यांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे माध्यम हे ओळखून समाजातील तळागाळातील सर्वसामान्यांचा मुलं शिकले पाहिजे यासाठी पराकाष्ठा केली.शिक्षणातून स्वताचा उद्धार करून समाजाचा उद्धार करणे ही जवाबदारी प्रत्येकांनी ओळखून कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे शिक्षण थांबणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले.

या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन निमित्ताने आयोजित माता पालक मेळाव्याचे प्रास्ताविक विनायक राजमाने,सूत्रसंचलन शालेय विद्यार्थिनी कु.इशा देशमुख व कु.तनुजा जाधव

तर आभार व्यक्त अरुण गोचडे यांनी केले.

---------------------------

●क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जीवनपटाचे भिंतीपत्रकाचे अनावरण 

● 22 डिसेंबर गणित दिनानिमित्त आयोजित गणित विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण

● राज्य स्तरावर निवड झालेल्या विविध क्रीडा स्पर्धकांचा गुण गौरव

● कार्यक्रमास माता पालकांची लक्षणीय उपस्थिती

● कार्यक्रम संपन्न झाल्यावर  माता पालकांचा व शिक्षकांचा संवाद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या