इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:नवीन शैक्षणिक धोरणावर श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात झाले राज्यस्तरीय चर्चासत्र

 नवीन शैक्षणिक धोरणावर श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात झाले राज्यस्तरीय चर्चासत्र 



सिरसाळा (प्रतिनिधि):- येथील श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय ,जनविकास महाविद्यालय बनसारोळा, वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर, कै.  रमेश वरपूडकर महाविद्यालय सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमान *राज्यस्तरीय नवीन शैक्षणिक धोरण 2020* या विषयावर चर्चासत्राचे आयोजन दि. २५ जाने. २०२३ रोजी करण्यात आले होते. 

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बापूराव भुसारे हे होते, उद्घाटक मा. भगवानराव मोहिते, मा. रामेश्वर कदम हे आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. डी एन मोरे हे होते. तर विशेष उपस्थितीत प्राचार्य डॉ. अरुण दळवे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते व प्राचार्य डॉ. एच पी कदम हे होते. सर्वप्रथम श्री पंडितगुरु पार्डीकर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून चर्चासत्राचे उद्घाटन मान्यवरांनच्या हस्ते करण्यात आले आणि मतदार जन जागृती शपथ घेण्यात आली.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. डी एन मोरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करणे हे सर्वांच्या समोर मोठे आव्हान आहे, या धोरणामुळे शिक्षणातील टप्पे बदलले असून त्यांचे सकारात्मक परिणाम समाजावर होतील असे प्रतिपादन केले. तसेच शिक्षण धोरणाची उद्दिष्टे व समस्या यावर प्रकाश टाकला. या सत्राचा अध्यक्ष समारोप रामेश्वर कदम यांनी केला तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी केले सूत्रसंचालन प्रा. धनवे व्ही एस यांनी केले, तर आभार डॉ. ए व्हीं जाधव यांनी मानले.

या चर्चा सत्राच्या दुसऱ्या सत्रात डॉ आर टी बेद्रे (संचालक, एचआरडीसी हरीसिंग गौर विद्यापीठ सागर) यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे आव्हाने व उपाय योजना यावर सविस्तर मार्गदर्शन करताना प्राचीन काळातील शैक्षणीक धोरण त्यातील काळानुसार बदलत गेलेल्या शैक्षणीक संकल्पना त्यांची गरज व महत्त्व व आजची नविन परिस्थिती व नविन संकल्पना यावर सविस्तर प्रकाश टाकला. या सत्राचा अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ. अरुण दळवे यांनी केला तर आभार प्राचार्य डॉ. एच पी कदम यांनी मांडले सूत्रसंचालन डॉ जे वी तुडमे यांनी केले. या चर्चासत्रास प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या