दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:नवीन शैक्षणिक धोरणावर श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात झाले राज्यस्तरीय चर्चासत्र

 नवीन शैक्षणिक धोरणावर श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात झाले राज्यस्तरीय चर्चासत्र 



सिरसाळा (प्रतिनिधि):- येथील श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय ,जनविकास महाविद्यालय बनसारोळा, वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर, कै.  रमेश वरपूडकर महाविद्यालय सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमान *राज्यस्तरीय नवीन शैक्षणिक धोरण 2020* या विषयावर चर्चासत्राचे आयोजन दि. २५ जाने. २०२३ रोजी करण्यात आले होते. 

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बापूराव भुसारे हे होते, उद्घाटक मा. भगवानराव मोहिते, मा. रामेश्वर कदम हे आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. डी एन मोरे हे होते. तर विशेष उपस्थितीत प्राचार्य डॉ. अरुण दळवे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते व प्राचार्य डॉ. एच पी कदम हे होते. सर्वप्रथम श्री पंडितगुरु पार्डीकर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून चर्चासत्राचे उद्घाटन मान्यवरांनच्या हस्ते करण्यात आले आणि मतदार जन जागृती शपथ घेण्यात आली.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. डी एन मोरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करणे हे सर्वांच्या समोर मोठे आव्हान आहे, या धोरणामुळे शिक्षणातील टप्पे बदलले असून त्यांचे सकारात्मक परिणाम समाजावर होतील असे प्रतिपादन केले. तसेच शिक्षण धोरणाची उद्दिष्टे व समस्या यावर प्रकाश टाकला. या सत्राचा अध्यक्ष समारोप रामेश्वर कदम यांनी केला तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी केले सूत्रसंचालन प्रा. धनवे व्ही एस यांनी केले, तर आभार डॉ. ए व्हीं जाधव यांनी मानले.

या चर्चा सत्राच्या दुसऱ्या सत्रात डॉ आर टी बेद्रे (संचालक, एचआरडीसी हरीसिंग गौर विद्यापीठ सागर) यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे आव्हाने व उपाय योजना यावर सविस्तर मार्गदर्शन करताना प्राचीन काळातील शैक्षणीक धोरण त्यातील काळानुसार बदलत गेलेल्या शैक्षणीक संकल्पना त्यांची गरज व महत्त्व व आजची नविन परिस्थिती व नविन संकल्पना यावर सविस्तर प्रकाश टाकला. या सत्राचा अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ. अरुण दळवे यांनी केला तर आभार प्राचार्य डॉ. एच पी कदम यांनी मांडले सूत्रसंचालन डॉ जे वी तुडमे यांनी केले. या चर्चासत्रास प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....