परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:नवीन शैक्षणिक धोरणावर श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात झाले राज्यस्तरीय चर्चासत्र

 नवीन शैक्षणिक धोरणावर श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात झाले राज्यस्तरीय चर्चासत्र 



सिरसाळा (प्रतिनिधि):- येथील श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय ,जनविकास महाविद्यालय बनसारोळा, वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर, कै.  रमेश वरपूडकर महाविद्यालय सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमान *राज्यस्तरीय नवीन शैक्षणिक धोरण 2020* या विषयावर चर्चासत्राचे आयोजन दि. २५ जाने. २०२३ रोजी करण्यात आले होते. 

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बापूराव भुसारे हे होते, उद्घाटक मा. भगवानराव मोहिते, मा. रामेश्वर कदम हे आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. डी एन मोरे हे होते. तर विशेष उपस्थितीत प्राचार्य डॉ. अरुण दळवे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते व प्राचार्य डॉ. एच पी कदम हे होते. सर्वप्रथम श्री पंडितगुरु पार्डीकर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून चर्चासत्राचे उद्घाटन मान्यवरांनच्या हस्ते करण्यात आले आणि मतदार जन जागृती शपथ घेण्यात आली.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. डी एन मोरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करणे हे सर्वांच्या समोर मोठे आव्हान आहे, या धोरणामुळे शिक्षणातील टप्पे बदलले असून त्यांचे सकारात्मक परिणाम समाजावर होतील असे प्रतिपादन केले. तसेच शिक्षण धोरणाची उद्दिष्टे व समस्या यावर प्रकाश टाकला. या सत्राचा अध्यक्ष समारोप रामेश्वर कदम यांनी केला तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी केले सूत्रसंचालन प्रा. धनवे व्ही एस यांनी केले, तर आभार डॉ. ए व्हीं जाधव यांनी मानले.

या चर्चा सत्राच्या दुसऱ्या सत्रात डॉ आर टी बेद्रे (संचालक, एचआरडीसी हरीसिंग गौर विद्यापीठ सागर) यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे आव्हाने व उपाय योजना यावर सविस्तर मार्गदर्शन करताना प्राचीन काळातील शैक्षणीक धोरण त्यातील काळानुसार बदलत गेलेल्या शैक्षणीक संकल्पना त्यांची गरज व महत्त्व व आजची नविन परिस्थिती व नविन संकल्पना यावर सविस्तर प्रकाश टाकला. या सत्राचा अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ. अरुण दळवे यांनी केला तर आभार प्राचार्य डॉ. एच पी कदम यांनी मांडले सूत्रसंचालन डॉ जे वी तुडमे यांनी केले. या चर्चासत्रास प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!