इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन

 ■पीक विमा व इतर प्रश्नांना घेऊन किसान सभा मैदानात



●जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन


परळी / प्रतिनिधी


बीड जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांना २०२२ अतिवृष्टी अनुदान अद्याप वाटप झाला नाही व २०२२खरीप विमा वाटपात देखील ताफवती व पारदर्शकता नाही. ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान, पीक विमा मिळाला त्यांची बँक खाती होल्ड करणे.पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, कृषी वीज पुरवठा व शेत मालास हमीभाव या प्रश्नावर किसान सभा बीड जिल्हा कमिटीच्या वतीने सोमवार दि ९ जानेवारी रोजी जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


शासन व पीक विमा कंपनीने बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची चेष्टा केली असून जानेवारी महिना सुरू असून अद्याप देखील अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळलेले नाही.कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या उद्योगपतींच्या खात्याला होल्ड न लावता शेतकऱ्यांच्या अनुदान , पीक विमा मिळत असलेल्या खात्याला शासन,विमा कंपनी व बँका होल्ड करीत आहे यामधून शासनाची शेतकरी विरोधी भूमिका स्पष्ट होत आहे.कृषी पंपाला योग्य दाबाने सलग 8 तास वीज पुरवठा देण्यात यावा.सोयाबीन व कापूस याचे दर कमी होण्यास कारणीभूत ठरलेले आयात धोरण,कापसू पिकावर कमी केलेले आयात शुल्क हे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचे ठरत असल्याने सर्व शेती मालास योग्य हमीभाव द्यावा यासह इतर मागण्या घेऊन अखिल भारतीय किसान सभा बीड च्या वतीने सोमवार दि ९ जानेवारी रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. एड. अजय बुरांडे, सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे,कॉ. काशीराम शिरसाठ,कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठोड, कॉ.जगदीश फरताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या