इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन

 ■पीक विमा व इतर प्रश्नांना घेऊन किसान सभा मैदानात



●जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन


परळी / प्रतिनिधी


बीड जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांना २०२२ अतिवृष्टी अनुदान अद्याप वाटप झाला नाही व २०२२खरीप विमा वाटपात देखील ताफवती व पारदर्शकता नाही. ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान, पीक विमा मिळाला त्यांची बँक खाती होल्ड करणे.पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, कृषी वीज पुरवठा व शेत मालास हमीभाव या प्रश्नावर किसान सभा बीड जिल्हा कमिटीच्या वतीने सोमवार दि ९ जानेवारी रोजी जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


शासन व पीक विमा कंपनीने बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची चेष्टा केली असून जानेवारी महिना सुरू असून अद्याप देखील अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळलेले नाही.कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या उद्योगपतींच्या खात्याला होल्ड न लावता शेतकऱ्यांच्या अनुदान , पीक विमा मिळत असलेल्या खात्याला शासन,विमा कंपनी व बँका होल्ड करीत आहे यामधून शासनाची शेतकरी विरोधी भूमिका स्पष्ट होत आहे.कृषी पंपाला योग्य दाबाने सलग 8 तास वीज पुरवठा देण्यात यावा.सोयाबीन व कापूस याचे दर कमी होण्यास कारणीभूत ठरलेले आयात धोरण,कापसू पिकावर कमी केलेले आयात शुल्क हे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचे ठरत असल्याने सर्व शेती मालास योग्य हमीभाव द्यावा यासह इतर मागण्या घेऊन अखिल भारतीय किसान सभा बीड च्या वतीने सोमवार दि ९ जानेवारी रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. एड. अजय बुरांडे, सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे,कॉ. काशीराम शिरसाठ,कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठोड, कॉ.जगदीश फरताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....