इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन

 ■पीक विमा व इतर प्रश्नांना घेऊन किसान सभा मैदानात



●जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन


परळी / प्रतिनिधी


बीड जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांना २०२२ अतिवृष्टी अनुदान अद्याप वाटप झाला नाही व २०२२खरीप विमा वाटपात देखील ताफवती व पारदर्शकता नाही. ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान, पीक विमा मिळाला त्यांची बँक खाती होल्ड करणे.पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, कृषी वीज पुरवठा व शेत मालास हमीभाव या प्रश्नावर किसान सभा बीड जिल्हा कमिटीच्या वतीने सोमवार दि ९ जानेवारी रोजी जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


शासन व पीक विमा कंपनीने बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची चेष्टा केली असून जानेवारी महिना सुरू असून अद्याप देखील अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळलेले नाही.कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या उद्योगपतींच्या खात्याला होल्ड न लावता शेतकऱ्यांच्या अनुदान , पीक विमा मिळत असलेल्या खात्याला शासन,विमा कंपनी व बँका होल्ड करीत आहे यामधून शासनाची शेतकरी विरोधी भूमिका स्पष्ट होत आहे.कृषी पंपाला योग्य दाबाने सलग 8 तास वीज पुरवठा देण्यात यावा.सोयाबीन व कापूस याचे दर कमी होण्यास कारणीभूत ठरलेले आयात धोरण,कापसू पिकावर कमी केलेले आयात शुल्क हे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचे ठरत असल्याने सर्व शेती मालास योग्य हमीभाव द्यावा यासह इतर मागण्या घेऊन अखिल भारतीय किसान सभा बीड च्या वतीने सोमवार दि ९ जानेवारी रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. एड. अजय बुरांडे, सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे,कॉ. काशीराम शिरसाठ,कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठोड, कॉ.जगदीश फरताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!