दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सणाप्रमाणे साजरा करावा - रानबा गायकवाड

 सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सणाप्रमाणे साजरा करावा - रानबा गायकवाड




परळी, प्रतिनिधी.    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे या देशातील महिलांना शिक्षणाचे द्वारे खऱ्या अर्थाने खुली झाली. त्यामुळे या देशातील तमाम बहुजनांनी विशेषतः महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सणाप्रमाणे साजरा करावा असे आवहान ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले. ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रीमती कृष्णाबाई देशमुख  विद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडर्न महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा घटेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक प्रा. बाबासाहेब देशमुख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यू हायस्कूलचे माजी प्राचार्य तथा घटेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक मधुकरराव चव्हाण, कृष्णाबाई देशमुख माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एच. चव्हाण प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण आटोळकर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाली की, या देशातील केवळ महिलांनाच नाही तर बहुजन समाजाला शिक्षणाचे द्वारे खऱ्या अर्थाने क्रांतीबा ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे खुले झाली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या केवळ या देशातील पहिल्या महिला शिक्षकाच नव्हत्या तर थोर समाज सुधारक होत्या. तर प्रा. बाबासाहेब देशमुख आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मुलींना जी संधी मिळाली त्याचे मुलींनी व महिलांनी सोने केले पाहिजे.

      याप्रसंगी मधुकरराव चव्हाण, बी एच. चव्हाण किरण आटोळकर  यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांचे,ओवी, लघु नाटकांचे तसेच विद्यार्थ्यांच्या भाषणाचे मान्यवर पाहुण्यांनी कौतुक केले. याच कार्यक्रमात कृष्णाबाई देशमुख विद्यालयाच्या विद्यार्थिनी, विद्यार्थ्यांनी सादर केलेली महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील नाटिका यांना विद्यार्थी व शिक्षक तसेच पालकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या वेशातील गणवेश परिधान केल्याने या कार्यक्रमात अधिकच रंगत वाढली.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक चव्हाण यांनी केले तर उत्कृष्ट सूत्रसंचालन मोदाणी मॅडम यांनी तर आभार मरवले मॅडम यांनी केले. कार्यक्रमास शिंदे सर गुडे सर, गंगणे सर, कसबे सर, गोरे सर, कदम सर,व कांबळे सर आदी शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....