इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS:सोशलमिडीयाचे बंधन तोडण्यासाठी संवादाची गरज-डॉ. संतोष मुंडे

 सोशलमिडीयाचे बंधन तोडण्यासाठी संवादाची गरज-डॉ. संतोष मुंडे



परळी वैजनाथ दि.२९ (प्रतिनिधी)

              लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तालुक्यातील पांगरी येथे विशेष युवती शिबीराचे आयोजन २७ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या शिबीरात शनिवारी (ता.२८) दुपारच्या सत्रात राष्ट्र विकासात युवकांचे योगदान या विषयावर डॉ संतोष मुंडे बोलत होते.

               लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 

युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास युवती विशेष शिबीरा दरम्यान शनिवारी दुपारी राष्ट्र विकासात युवकांचे योगदान या व्याख्यानास प्रमुख वक्ते दिव्यांगाचे आधारस्तंभ, सामाजिक कार्यकर्ते डॉ संतोष मुंडे, श्रीनिवास मुंडे, प्रा.शंकर कापसे, कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ विनोद जगतकर, प्रा.डॉ प्रविण दिग्रसकर, प्रा.डॉ रंजना शहाणे, प्रा राजर्षी कल्याणकर, प्रा. प्रविण फुटके, प्रा.विशाल पौळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ संतोष मुंडे म्हणाले की, आजच्या काळात मोबाईल मुळे संवाद हरवत चालला आहे. संवाद वाढवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबीराची आवश्यकता आहे. देशाच्या विकासात युवकांची मोठी भूमिका आहे. युवकांच्या योगदानामुळे राष्ट्र विकास होतो. मात्र अलिकडच्या मोबाईलच्या युगात संवाद हरवत चालला असल्याचे प्रतिपादन डॉ मुंडे यांनी केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा.डॉ दिग्रसकर यांनी सुत्रसंचालन माधुरी बडे,आभार वैष्णवी बागडे यांनी मानले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....