इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:सोशलमिडीयाचे बंधन तोडण्यासाठी संवादाची गरज-डॉ. संतोष मुंडे

 सोशलमिडीयाचे बंधन तोडण्यासाठी संवादाची गरज-डॉ. संतोष मुंडे



परळी वैजनाथ दि.२९ (प्रतिनिधी)

              लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तालुक्यातील पांगरी येथे विशेष युवती शिबीराचे आयोजन २७ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या शिबीरात शनिवारी (ता.२८) दुपारच्या सत्रात राष्ट्र विकासात युवकांचे योगदान या विषयावर डॉ संतोष मुंडे बोलत होते.

               लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 

युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास युवती विशेष शिबीरा दरम्यान शनिवारी दुपारी राष्ट्र विकासात युवकांचे योगदान या व्याख्यानास प्रमुख वक्ते दिव्यांगाचे आधारस्तंभ, सामाजिक कार्यकर्ते डॉ संतोष मुंडे, श्रीनिवास मुंडे, प्रा.शंकर कापसे, कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ विनोद जगतकर, प्रा.डॉ प्रविण दिग्रसकर, प्रा.डॉ रंजना शहाणे, प्रा राजर्षी कल्याणकर, प्रा. प्रविण फुटके, प्रा.विशाल पौळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ संतोष मुंडे म्हणाले की, आजच्या काळात मोबाईल मुळे संवाद हरवत चालला आहे. संवाद वाढवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबीराची आवश्यकता आहे. देशाच्या विकासात युवकांची मोठी भूमिका आहे. युवकांच्या योगदानामुळे राष्ट्र विकास होतो. मात्र अलिकडच्या मोबाईलच्या युगात संवाद हरवत चालला असल्याचे प्रतिपादन डॉ मुंडे यांनी केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा.डॉ दिग्रसकर यांनी सुत्रसंचालन माधुरी बडे,आभार वैष्णवी बागडे यांनी मानले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या