इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

 परळी औष्णिक विद्युत केंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा 

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक  वाचन 


परळी प्रतिनिधी 


२६ जाने २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पी. एन. भदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र सुरक्षा दल व मेस्कोच्या जवानांनी परेड सादर केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. 

याप्रसंगी  मुख्य अभियंता पी. एन. भदाणे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले कि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन ज्या दिवशी आपल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून अमलात आणून नव्या ऐतिहासिक पर्वाची सुरुवात केली. देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र मिळाले परंतु २६ जानेवारी १९५० पासून भारत देश लोकशाही गणतंत्र देश म्हणून जगभरात उदयास आला. भारत देशात लोकशाही पद्धतीने कामकाज सुरु झाल्याने प्रत्येक नागरिकास स्वतंत्र, समता, बंधुता व न्याय हि मानवी विकासाची मूल्य प्राप्त करण्यासाठी भारतीय संविधानाचा आधार घेऊन आपण वाटचाल करत आहोत. ज्ञान विज्ञानाच्या तंत्रज्ञानात जगभरात क्रांती झाली आहे. आपणही या तंत्रज्ञानाचा आधुनिक पद्धतीने वापर करून वीज निर्मितीत व विकासामध्ये योगदान देणारे सर्वच सैनिक, हुतात्म्यांना व महापुरुषांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे. भदाणे पुढे म्हणाले कि आपली महानिर्मिती कंपनी कठीण परिस्थितून मार्गक्रमण करीत असून या परिस्थितीत सर्वानी आपली कर्तव्य जर चांगल्या प्रकारे पार पडली तर त्यातून भविष्यात येणाऱ्या सर्व जवाबदाऱ्या आपण चांगल्या प्रकारे पार पडून महानिर्मितीच्या भविष्य उज्वलतेकडे नेण्यासाठी व सर्वांगीन विकासासाठी वचनबद्ध राहू. प्रजासत्ताक दिनानिमित्त परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व अधिकारी, अभियंता, कर्मचारी, कंत्राटदार व कंत्राटी कामगार यांना शुभेच्छा त्यांनी दिल्या. शेवटी ते म्हणाले कि सर्वजण वीज निर्नितीचे महान राष्ट्रीय कार्य यापुढेही असेच अखंड सुरु ठेवण्यासाठी कठीबद्द राहू.  या प्रसंगी उप मुख्य अभियंता एच के अवचार, अधीक्षक अभियंता एस एन बुकतारे , आर पी रेड्डी, चंद्रकांत मोराळे, श्रीगणेश मुंडे, के एस तूपसागर, सुरक्षा अधिकारी सचिन पवार,कल्याणाधिकारी दिलीप वंजारी, वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद येरणे, राजू गजलेआदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या