दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

 परळी औष्णिक विद्युत केंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा 

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक  वाचन 


परळी प्रतिनिधी 


२६ जाने २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पी. एन. भदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र सुरक्षा दल व मेस्कोच्या जवानांनी परेड सादर केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. 

याप्रसंगी  मुख्य अभियंता पी. एन. भदाणे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले कि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन ज्या दिवशी आपल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून अमलात आणून नव्या ऐतिहासिक पर्वाची सुरुवात केली. देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र मिळाले परंतु २६ जानेवारी १९५० पासून भारत देश लोकशाही गणतंत्र देश म्हणून जगभरात उदयास आला. भारत देशात लोकशाही पद्धतीने कामकाज सुरु झाल्याने प्रत्येक नागरिकास स्वतंत्र, समता, बंधुता व न्याय हि मानवी विकासाची मूल्य प्राप्त करण्यासाठी भारतीय संविधानाचा आधार घेऊन आपण वाटचाल करत आहोत. ज्ञान विज्ञानाच्या तंत्रज्ञानात जगभरात क्रांती झाली आहे. आपणही या तंत्रज्ञानाचा आधुनिक पद्धतीने वापर करून वीज निर्मितीत व विकासामध्ये योगदान देणारे सर्वच सैनिक, हुतात्म्यांना व महापुरुषांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे. भदाणे पुढे म्हणाले कि आपली महानिर्मिती कंपनी कठीण परिस्थितून मार्गक्रमण करीत असून या परिस्थितीत सर्वानी आपली कर्तव्य जर चांगल्या प्रकारे पार पडली तर त्यातून भविष्यात येणाऱ्या सर्व जवाबदाऱ्या आपण चांगल्या प्रकारे पार पडून महानिर्मितीच्या भविष्य उज्वलतेकडे नेण्यासाठी व सर्वांगीन विकासासाठी वचनबद्ध राहू. प्रजासत्ताक दिनानिमित्त परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व अधिकारी, अभियंता, कर्मचारी, कंत्राटदार व कंत्राटी कामगार यांना शुभेच्छा त्यांनी दिल्या. शेवटी ते म्हणाले कि सर्वजण वीज निर्नितीचे महान राष्ट्रीय कार्य यापुढेही असेच अखंड सुरु ठेवण्यासाठी कठीबद्द राहू.  या प्रसंगी उप मुख्य अभियंता एच के अवचार, अधीक्षक अभियंता एस एन बुकतारे , आर पी रेड्डी, चंद्रकांत मोराळे, श्रीगणेश मुंडे, के एस तूपसागर, सुरक्षा अधिकारी सचिन पवार,कल्याणाधिकारी दिलीप वंजारी, वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद येरणे, राजू गजलेआदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....