दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियनचा देशव्यापी एक दिवसीय लाक्षणिक संप

 युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियनचा देशव्यापी एक दिवसीय लाक्षणिक संप




परळी प्रतिनिधी 


बँक ऑफ महाराष्ट्र मधील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी संघटनानी मिळून एकत्रित येऊन स्थापन केलेल्या युनायटेड फोरम ऑफ महा बँक युनियन च्या वतीने दिनांक २७ जानेवारी रोजी एक दिवसाच्या देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक प्रामुख्याने नोकर भरतीच्या प्रश्नावर देण्यात आली आहे. 

    गेल्या १० वर्षात बँकेचा व्यवसाय २५०० पटीने वाढला आहे. ४५० नवीन शाखा उघडण्यात आल्या आहेत तर कर्मचाऱ्याची संख्या मात्र २०% ने कमी झाली आहे. बँक गेल्या अनेक वषार्पासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा या मुळे रिकाम्या झालेल्या जागा देखील भरत नाही याचा परिणाम म्हणून लोकांना रोज जास्त वेळ काम करावे लागते. सुट्टीच्या दिवशी देखील कामावर यावे लागते यामुळे कौटुंबिक जबाबदान्या पार पाडणे अशक्य झाले आहे. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होतआहे. त्यांच कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. याशिवाय अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे समाधानकारक ग्राहक सेवा देता येणे अशक्य झाले आहे. याचा बँकेच्या व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत आहे.

     महा बँकेतील कर्मचारी विलक्षण मानसिक तणावातून जात आहेत सर्व संघटनानी या प्रश्नी आपली कैफियत वारंवार माडली पण व्यवस्थापनयाला कुठलाच प्रतीसाद देत नाही हे लक्षात घेतानाईलाजाने संघटनानी शेवटचा मार्ग म्हणून शेवटी २७ जानेवारी संपाची हाक दिली आहे.शेवटचा मार्ग म्हणून डेप्युटी चीफ लेबरकमीशनर मुंबई यांनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण व्यवस्थापनाच्या आडमुठेपणा मुळे कुठलीही तडजोड घडुन आली नाही.या संपामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दलसंघटनेच्या वतीने दिलगीरी व्यक्त करण्यात येत आहेव असे आवाहन करण्यात येत आहे की उत्तम ग्राहक सेवेची गरज म्हणून नोकर भरती या त्यांच्या मागणीला ग्राहकांनी पाठिंबा द्यावा.

     याचा परिणाम म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र परळी वैजनाथ मार्केट मधील शाखेसमोर संपाच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी निर्देशने, कार्यक्रम संघटीत करून व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांना आपला तीव्र विरोध प्रदर्शित केला. या संपात महा बँकेतील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी यांनीही सहभाग नोंदवला त्यामुळे बँकेचे कामकाज पूर्ण ठप्प झाले. महाबँकेच्या देशव्यापी संपात बँकेतील कर्मचारी सुमंतकुमार,जयश्री गोस्वामी, भाग्यश्री साखरे,पूजा देशमुख,बालाजी डवरे,शिवरत्न आघाव, दिपक घाडगे,विलास जोशी सहभागी झाले आणि संप यशस्वी केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....