इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:किसान सभेच्या ट्रॅक्टर मोर्चानी परळी शहर दणानले

 केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणामुळे शेतकरी संकटात- कॉ अजय बुरांडे

किसान सभेच्या ट्रॅक्टर मोर्चानी परळी शहर दणानले


परळी वै ता.२५ प्रतिनिधी


     केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. जोपर्यंत हमी भावाचा कायदा होत नाही तोपर्यंत संयुक्त किसान मोर्चा देशभवर वेगवेगळे आंदोलन करणार आहे. केंद्र सरकारने संयुक्त किसान मोर्चाला दिलेले लेखी आश्वासनाची आठवन करूण देण्यासाठी ट्रक्टर मोर्चा काढण्यात आला असल्याचे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ अजय बुरांडे यांनी सांगीतले.

     संयुक्त किसान मोर्चानी केलेल्या आवाहानानुसार बुधवारी (ता.२५) किसान सभेनी परळी तहसिल कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला. परळी तहसिलवर पहिल्यांदाच ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. दीडपट हमी भावाचा कायदा, संपूर्ण कर्जमुक्ती, केंद्रीय वीज विधेयकाची वापसी, पेन्शन, पीक विमा देशव्यापी प्रश्नांच्या सोबत राज्यातील, पीक विमा, गायरान व देवस्थान जमिनी, व, अपूर्ण कर्जमुक्ती तसेच बीड जिल्ह्यातील खरीप २०२२ मधील अतिवृष्टी अनुदान, २०२२ मधील खरीप विमा वाटपातील ताफवती व अपारदर्शकता.शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड करणे.पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, कृषी वीज पुरवठा व शेत मालास हमीभाव या मागण्यांसाठी या संयुक्त किसान मोर्च्यांने यासारखे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी बुधवारी (ता.२५) किसान सभेनी परळी तहसिलवर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर सह मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ अजय बुरांडे, कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ पांडुरंग राठोड, कॉ भगवान बडे, माकपचे कॉ पी एस घाडगे, सिटु चे कॉ बी जी खाडे, कॉ गंगाधर पोटभरे, कॉ विष्णु देशमुख, कॉ बालासाहेब कडभाने यांच्यासह किसान सभेचे नेते आंदोलनात सहभागी झाले होते.

Video 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या