इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS:राष्ट्रीय संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी

 किर्तन मनोरंजनाचे नाही तर ते समाज परिवर्तनाचे साधन आहे - ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले 




शक्तीकुंज वसाहत येथे भव्य किर्तन, महाप्रसाद 
 रथामधून मिरवणूकीने  ऐश्वर्य संपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी  साजरी  

परळी वैद्यनाथ दि. ७(प्रतिनिधी)किर्तन हे मनोरंजनाचे नाही तर ते समाज परिवर्तन चे शक्तीशाली साधन असून या साधनाकडे मनोरंज म्हणून पाहणे अतिशय चूकीचे असून किर्तनकारांनी सुध्दा हे पातक करू नये. तसेच संताची पुजा न करता केवळ देवाची पूजा करणे सुध्दा अधर्मच ठरतो असे प्रतिपादन हरी भक्ती परायण गुरूवर्य पांडुरंग महाराज घुले यांनी परळी वैद्यनाथ,शक्तीकुंज वसाहत  येथे आयोजीत ऐश्वर्य संपन्न राष्ट्रीय संत भगवान यांच्या पुण्यतिथी सोहळ्या प्रसंगी केले. 

    शनिवार दि. ७ जानेवारी रोजी परळी वैद्यनाथ शहरातील शक्तीकुंज वसाहत या ठिकाणी ऐश्वर्य संपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य किर्तन  सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

जगद्गुरु संत तुकाराम गाथा मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांनी संत तुकाराम महाराज यांच्या संतसमागम एखादिया परी । राहावें त्याचे द्वारीं श्वानयाती ॥१॥ 


तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचें ॥ध्रु.॥ 


कामारी बटीक सेवेचे सेवक । दीनपण रंक तेथें भलें ॥२॥ 


तुका म्हणे सर्व सुख त्या संगती । घडेल पंगती संतांचिया ॥३॥

या अंभगांचे आपल्या किर्तनातून विवेचन करतांना सांगीतले की, संतांची संगती आपणास कोणत्याही प्रकारे घडली तरी आपला उध्दार होतो. हे पटवून देतांना त्यांनी दरोडेखोर असणारा वाल्या कोळी महर्षी नारदांना लुटण्यासाठी आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने संग घडला. तरी ही महर्षी नारदांनी त्यांचा उध्दार केला. तसेच हरवलेली म्हैस विचारण्यासाठी गेलेला गंगाधर याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी उपदेश करून त्यालाही संन्मार्गाला लावले. एवढे च नाही तर चांगल्या व्यक्ती च्या दारात श्वान होऊन जरी राहीले तरी तेथे कानी पडणार्या हरीनामामुळे उध्दार होतो. त्यासाठी संताच्या संगतीत आणि संत सेवेत लिन व्हावे असे त्यांनी सांगितले. 

संयोजन समिती च्या वतीने महाप्रसाद ठेवण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेची भव्य रथामधून मिरवणूक काढण्यात आली . गेली पंचवीस वर्षापासून शक्तीकुंज वसाहत येथे हा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....