इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:राष्ट्रीय संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी

 किर्तन मनोरंजनाचे नाही तर ते समाज परिवर्तनाचे साधन आहे - ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले 




शक्तीकुंज वसाहत येथे भव्य किर्तन, महाप्रसाद 
 रथामधून मिरवणूकीने  ऐश्वर्य संपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी  साजरी  

परळी वैद्यनाथ दि. ७(प्रतिनिधी)किर्तन हे मनोरंजनाचे नाही तर ते समाज परिवर्तन चे शक्तीशाली साधन असून या साधनाकडे मनोरंज म्हणून पाहणे अतिशय चूकीचे असून किर्तनकारांनी सुध्दा हे पातक करू नये. तसेच संताची पुजा न करता केवळ देवाची पूजा करणे सुध्दा अधर्मच ठरतो असे प्रतिपादन हरी भक्ती परायण गुरूवर्य पांडुरंग महाराज घुले यांनी परळी वैद्यनाथ,शक्तीकुंज वसाहत  येथे आयोजीत ऐश्वर्य संपन्न राष्ट्रीय संत भगवान यांच्या पुण्यतिथी सोहळ्या प्रसंगी केले. 

    शनिवार दि. ७ जानेवारी रोजी परळी वैद्यनाथ शहरातील शक्तीकुंज वसाहत या ठिकाणी ऐश्वर्य संपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य किर्तन  सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

जगद्गुरु संत तुकाराम गाथा मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांनी संत तुकाराम महाराज यांच्या संतसमागम एखादिया परी । राहावें त्याचे द्वारीं श्वानयाती ॥१॥ 


तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचें ॥ध्रु.॥ 


कामारी बटीक सेवेचे सेवक । दीनपण रंक तेथें भलें ॥२॥ 


तुका म्हणे सर्व सुख त्या संगती । घडेल पंगती संतांचिया ॥३॥

या अंभगांचे आपल्या किर्तनातून विवेचन करतांना सांगीतले की, संतांची संगती आपणास कोणत्याही प्रकारे घडली तरी आपला उध्दार होतो. हे पटवून देतांना त्यांनी दरोडेखोर असणारा वाल्या कोळी महर्षी नारदांना लुटण्यासाठी आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने संग घडला. तरी ही महर्षी नारदांनी त्यांचा उध्दार केला. तसेच हरवलेली म्हैस विचारण्यासाठी गेलेला गंगाधर याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी उपदेश करून त्यालाही संन्मार्गाला लावले. एवढे च नाही तर चांगल्या व्यक्ती च्या दारात श्वान होऊन जरी राहीले तरी तेथे कानी पडणार्या हरीनामामुळे उध्दार होतो. त्यासाठी संताच्या संगतीत आणि संत सेवेत लिन व्हावे असे त्यांनी सांगितले. 

संयोजन समिती च्या वतीने महाप्रसाद ठेवण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेची भव्य रथामधून मिरवणूक काढण्यात आली . गेली पंचवीस वर्षापासून शक्तीकुंज वसाहत येथे हा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या