युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:आसाराम बापूला जन्मठेप !

 आसाराम बापूला जन्मठेप !



मुंबई- बलात्काराच्या आरोपाखाली गेल्या दहा वर्षांपासून कारागृहात असणारे तथाकथित संत आसाराम याला न्यायालयाने एका प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

आसाराम बापूवर उत्तर प्रदेशच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे आसारामच्या आश्रमात शिकत होती.या मुलीच्या आरोपानुसार, आसारामने तिला जोधपूरजवळच्या आश्रमात बोलावलं होतं. आणि ऑगस्ट 15, 2013ला तिच्या बलात्कार करण्यात आला. आसाराम बापू यांच्या खटल्याचा घटनाक्रम 20 ऑगस्ट 2013ला आसारामानी 15 ऑगस्ट रोजी एका मुलीचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिल्लीत दाखल करण्यात आली नंतर हा खटला जोधपूर कोर्टाकडे सोपण्यात आला. 23 ऑगस्ट 2013ला आसारामाविरोधात गुन्हा दाखल झाला.

पण यावर भडकलेल्या आसाराम समर्थकांची कमला मार्केट पोलीस स्टेशनमधे तोडफोड केली. – 28 ऑगस्ट 2013ला पीडित मुलीच्या वडिलांनी आसारामला फाशी देण्याची मागणी केली. तर दुसरीकडे मुलगी मनोरूग्ण असल्याचा दावा आसारामने केला.

दरम्यान 29 ऑगस्ट 2013ला काँग्रेस नेते मुद्दाम त्यांना लक्ष्य करून असले आरोप करत आहेत असा अप्रत्यक्ष आरोप आसारामने केला.31 ऑगस्ट 2013ला आसारामला जोधपूर पोलिसांनी अटक केली, आसारामची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. पण या दरम्यान समर्थकांनी कोर्टाबाहेर गोंधळ घातला होता. नोव्हेंबर 2013ला जोधपूर पोलिसांनी आसाराम विरोधात आरोपपत्र दाखल केलं. आसाराम आणि चार लोकांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले.

फेब्रुवारी 2014ला आसारामविरोधात कोर्टात सुनावणीला सुरूवात झाली. ज्येष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनी आसाराम बापू यांचं वकीलपत्र घेतलं होतं. आसाराम बापूंना वेगळाच आजार आहे ज्यामुळे ते महिला त्याच्याकडे आकर्षित होतात असा अजब युक्तिवाद कोर्टात करण्यात आला. फेब्रुवारी 2015ला आसाराम बापू केसमधील एक साक्षीदार राहूल सचान जेव्हा आपलं स्टेटमेंट द्यायला कोर्टात चालला होता तेव्हा त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

8 जुलै 2015ला दुसऱ्या एक साक्षीदार सुधा पाठक साक्षी देण्यावरून मागे फिरल्या आणि त्यांनी कोर्टात सांगितलं की आम्हाला आसाराम बापूबद्दल काहीच माहिती नाही. 12 जुलै 2015रोजी क्रिपालसिंग या साक्षीदारची हत्या शहाजहानपूरमध्ये करण्यात आली. 7 एप्रिल 2018रोजी जोधपूर कोर्टात दोन्ही पक्षांचे युक्तीवाद संपले. आणि आज 25 एप्रिल रोजी त्याच्या शिक्षेवर कोर्टात सुनावणी झाली.

दरम्यान न्यायालयाने या प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेप सुनावली आहे.त्यामुळे त्यांच्या भक्तांना मोठा धक्का बसला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या