इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:अंबाजोगाई, केज तालुक्यातील सुमारे साडेदहा हजार हेक्टर क्षेत्रास मिळणार पाणी

 मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करून सिंचनासाठी तातडीने पाणी सोडा - धनंजय मुंडेंचे पाटबंधारे विभागास पत्र




धानोरा (बु.) येथील लोखंडी पुलाच्या दुरुस्तीचेही काम पूर्ण करावे, मुंडेंची मागणी

परळी (दि. 5) - बीड व लातूर जिल्ह्याची जलवाहिनी असलेले मांजरा धरण याही वर्षी पूर्ण क्षमतेने भरले असून, या धरणाच्या कालव्यांच्या देखभाल व दुरुस्तीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण केली जावीत व त्याद्वारे शेती सिंचनासाठी नियमित पाणी सोडले जावे, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी एका पत्राद्वारे पाटबंधारे विभागाकडे केली आहे. 


या धरणातून जाणाऱ्या डाव्या कालव्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई व केज या दोन तालुक्यातील आवाड शिरपुरा, नायगाव, सौंदना, इस्थळ, आपेगाव, धानोरा (बु.) कोपरा-अंजनपूर, देवळा, पाटोदा, ममदापुर, अकोला, मुडेगाव, सुगाव, तडोळा आदी गावांतील सुमारे 10 हजार 558 हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येते. हा संपूर्ण भाग अत्यंत सुपीक असून या पाण्याच्या भरोशावर या भागातील शेतकरी ऊस व तत्सम रब्बी हंगामातील पिके घेतात.


रब्बी हंगामामध्ये डिसेंबर महिन्यातच मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी सोडणे अपेक्षित असून अद्याप या कालव्याची देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण न झाल्याने तसेच कालवा सल्लागार समितीची बैठक वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांना अद्याप डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे धनंजय मुंडे आपल्या पत्रात म्हणतात. 


या भागातील पिके पाण्याअभावी सुकू लागले असल्याचेही अनेक शेतकऱ्यांनी कळवले असून ऊसाला देखील दोन आठवड्यांच्या आत पाणी न मिळाल्यास उसाचे पीक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी व नैसर्गिक गरज लक्षात घेत सदर कालव्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण केली जावीत, धानोरा बुद्रुक येथील लोखंडी पुलाचे दुरुस्तीचे काम पूर्ण केले जावे व डाव्या कालव्याद्वारे नियमित सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार त्यांच्या कार्यालयाकडून पाटबंधारे लातूर विभागाचे अधीक्षक अभियंता व संबंधित कार्यकारी अभियंता याना देण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!