इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:अंबाजोगाई, केज तालुक्यातील सुमारे साडेदहा हजार हेक्टर क्षेत्रास मिळणार पाणी

 मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करून सिंचनासाठी तातडीने पाणी सोडा - धनंजय मुंडेंचे पाटबंधारे विभागास पत्र




धानोरा (बु.) येथील लोखंडी पुलाच्या दुरुस्तीचेही काम पूर्ण करावे, मुंडेंची मागणी

परळी (दि. 5) - बीड व लातूर जिल्ह्याची जलवाहिनी असलेले मांजरा धरण याही वर्षी पूर्ण क्षमतेने भरले असून, या धरणाच्या कालव्यांच्या देखभाल व दुरुस्तीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण केली जावीत व त्याद्वारे शेती सिंचनासाठी नियमित पाणी सोडले जावे, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी एका पत्राद्वारे पाटबंधारे विभागाकडे केली आहे. 


या धरणातून जाणाऱ्या डाव्या कालव्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई व केज या दोन तालुक्यातील आवाड शिरपुरा, नायगाव, सौंदना, इस्थळ, आपेगाव, धानोरा (बु.) कोपरा-अंजनपूर, देवळा, पाटोदा, ममदापुर, अकोला, मुडेगाव, सुगाव, तडोळा आदी गावांतील सुमारे 10 हजार 558 हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येते. हा संपूर्ण भाग अत्यंत सुपीक असून या पाण्याच्या भरोशावर या भागातील शेतकरी ऊस व तत्सम रब्बी हंगामातील पिके घेतात.


रब्बी हंगामामध्ये डिसेंबर महिन्यातच मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी सोडणे अपेक्षित असून अद्याप या कालव्याची देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण न झाल्याने तसेच कालवा सल्लागार समितीची बैठक वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांना अद्याप डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे धनंजय मुंडे आपल्या पत्रात म्हणतात. 


या भागातील पिके पाण्याअभावी सुकू लागले असल्याचेही अनेक शेतकऱ्यांनी कळवले असून ऊसाला देखील दोन आठवड्यांच्या आत पाणी न मिळाल्यास उसाचे पीक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी व नैसर्गिक गरज लक्षात घेत सदर कालव्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण केली जावीत, धानोरा बुद्रुक येथील लोखंडी पुलाचे दुरुस्तीचे काम पूर्ण केले जावे व डाव्या कालव्याद्वारे नियमित सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार त्यांच्या कार्यालयाकडून पाटबंधारे लातूर विभागाचे अधीक्षक अभियंता व संबंधित कार्यकारी अभियंता याना देण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या