प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड, पगारासाठी शासनाकडून ३०० कोटी निधी वितरीत

 एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड, पगारासाठी शासनाकडून ३०० कोटी निधी वितरीत


मुंबई  : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य शासनाने ३०० कोटी रुपये वितरीत केले आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा पगार मिळालेला नव्हता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निधी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर २०२२ चे वेतन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी विनंती उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांनी पत्रान्वये शासनास विनंती केली होती. त्यानुषंगाने एसटी कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर २०२२ च्या वेतनासाठी सन २०२२-२३ मधील गृह अर्थसहाय्य तरतूदीमधून ३०० कोटी एवढी रक्कम रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होतो. पण १२ तारीख उलटली तरी अद्याप कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याआधी २०२१ मध्ये कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलिनीकरणाची मागणी करत संप केला होता. हा संप दीर्घकाळ चालला. राज्यातील एसटी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने दर महिन्याच्या ७ ते १० तारखेच्या दरम्यान कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण १० तारीख उलटून गेली तरी त्यांना पगार मिळालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांना निश्चित वेळेत पगार न मिळणे हा न्यायालयाचा अपमान असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या