परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड, पगारासाठी शासनाकडून ३०० कोटी निधी वितरीत

 एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड, पगारासाठी शासनाकडून ३०० कोटी निधी वितरीत


मुंबई  : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य शासनाने ३०० कोटी रुपये वितरीत केले आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा पगार मिळालेला नव्हता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निधी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर २०२२ चे वेतन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी विनंती उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांनी पत्रान्वये शासनास विनंती केली होती. त्यानुषंगाने एसटी कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर २०२२ च्या वेतनासाठी सन २०२२-२३ मधील गृह अर्थसहाय्य तरतूदीमधून ३०० कोटी एवढी रक्कम रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होतो. पण १२ तारीख उलटली तरी अद्याप कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याआधी २०२१ मध्ये कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलिनीकरणाची मागणी करत संप केला होता. हा संप दीर्घकाळ चालला. राज्यातील एसटी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने दर महिन्याच्या ७ ते १० तारखेच्या दरम्यान कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण १० तारीख उलटून गेली तरी त्यांना पगार मिळालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांना निश्चित वेळेत पगार न मिळणे हा न्यायालयाचा अपमान असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!