इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:विद्यार्थी, भाविक व नागरिकांना त्रास होणार्‍या मेरूगिरी मार्गावरील घाण पाण्याची व्यवस्था करा

 विद्यार्थी, भाविक व नागरिकांना त्रास होणार्‍या मेरूगिरी मार्गावरील घाण पाण्याची व्यवस्था करा



अभयकुमार ठक्कर व सहकार्‍यांचे नगर परिषदेला निवेदन


परळी/प्रतिनिधी

बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असणारे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेवून मेरूगिरी प्रदक्षिणा करणार्‍या भाविकांची संख्या जास्त असते. याच मार्गावर इमदादुल विद्यालयाच्या बाजूस असलेल्या नालीचे घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने त्याचा त्रास विद्यार्थी, भाविक व नागरिकांना होत असून या घाण पाण्याची लवकरात लवकर व्यवस्था करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर व त्यांच्या सहकार्‍यांनी आज निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, परळी शहरातील मेरूगिरी प्रदक्षिणा करण्यासाठी भाविकांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. या ठिकाणी महात्मा बसवेश्वर कॉलनी, नवगण महाविद्यालय असून येथे मोठया प्रमाणात नागरीक राहतात. तसेच याच भागात इमदादुल विद्यालयाच्या बाजूस असणार्‍या नालीचे घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने भाविक, विद्यार्थी व नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. या घाण पाण्यामुळे मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरत असून विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.

नगर परिषद प्रशासनाने याकडे त्वरील लक्ष देवून ही नागरी समस्या त्वरीत सोडवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर यांच्यासह युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक प्राचार्य अतुल दुबे सर, माजी तालुकाप्रमुख जगन्नाथ साळुंके, जेष्ठ नेते सतिश जगताप, माजी शहर संघटक संजय कुकडे, युवा सेनेचे विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी,शिवाजीनगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी,  उप शहर प्रमुख किशन बुंदेले, छत्रपती शिवाजी चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, बबन ढेंबरे, अमित कचरे,सचिन लोढा, बजरंग औटी,मनिष जोशी,लक्ष्मण मुंडे,योगेश घेवारे,विजय पवार,माऊली मुंडे, नरेश मैड,योगेश जाधव, प्रकाश देवकर, जगन्नाथ तुपसौंदर, सोमनाथ गायकवाड, पंकज पांचाळ, संस्कार पालीमकर, आकाश जाधव, जगदीश पवार, विकास देवकर, सुधाकर बारसकार यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या