प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS: वीज वितरणाच्या विरोधात तीव्र संताप

 वीजवितरणकडून सातत्याने गणेशपार विभागावर अन्याय; एकतर दोन दिवसाआड पाणी सुटते त्याचवेळी लाईट नसते - अश्विन मोगरकर 




परळी वैजनाथ

परळी शहरातील फक्त गणेशपार भागातच रोज सकाळी लाईट जात आहे, आधीच शहरात दोन दिवसाआड पाणी येत आहे त्यात सकाळी लाईट नसल्यामुळे महिला वर्गाची तारांबळ उडते आहे. हा आमच्या गणेशपार भागावरचा अन्याय आहे. ही अन्यायकारक लोडशेडिंग त्वरित बंद करण्यात यावी अन्यथा महावितरण समोर आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी दिला आहे.

परळी शहरातील फक्त गणेशपार भागातच महावितरण तर्फे लोडशेडिंग केली जात आहे. विजबिलांची पठाणी वसुली करत असलेले महावितरण थोडेसे बिल बाकी असेल तर वीज पुरवठा खंडित करते आहे. परंतु प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या बहुसंख्य ग्राहकांना काही विजचोरांमुळे महावितरण अन्यायकारक लोडशेडिंगची शिक्षा देत आहे. शहरात गणेशपार भागातच वीज चोरी होते काय? इतर भागातही वीजचोरी आहेच परंतु लोडशेडिंग फक्त गणेशपार भागातच होत आहे. वीजचोरी थांबवणे हे महावितरण अधिकाऱ्यांचे कामच आहे, त्याची पगार त्यांना मिळते परंतु चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार परळीचे महावितरणचे अधिकारी करत आहेत. 

परळी शहरात दोन दिवसाआड पाणी येते आणि पाणी आल्यास सकाळी लाईट नसते. सकाळी शाळेत जाणारी मुले, नौकरदार, व्यापारी यांना थंडीचे गार पाण्याने आंघोळ करावी लागत आहे. अती थंडीमुळे आधीच लहान मुले व वृद्ध माणसे आजारी पडत आहेत.  MSEB मुळे विनाकारण त्रास होत आहे. 

ही फक्त गणेशपार भागातील अन्यायकारक लोडशेडिंग त्वरित बंद करण्यात यावी अन्यथा गणेशपार भागातील नागरिकांना घेऊन आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल असा इशारा भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी दिला आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या