इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS: वीज वितरणाच्या विरोधात तीव्र संताप

 वीजवितरणकडून सातत्याने गणेशपार विभागावर अन्याय; एकतर दोन दिवसाआड पाणी सुटते त्याचवेळी लाईट नसते - अश्विन मोगरकर 




परळी वैजनाथ

परळी शहरातील फक्त गणेशपार भागातच रोज सकाळी लाईट जात आहे, आधीच शहरात दोन दिवसाआड पाणी येत आहे त्यात सकाळी लाईट नसल्यामुळे महिला वर्गाची तारांबळ उडते आहे. हा आमच्या गणेशपार भागावरचा अन्याय आहे. ही अन्यायकारक लोडशेडिंग त्वरित बंद करण्यात यावी अन्यथा महावितरण समोर आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी दिला आहे.

परळी शहरातील फक्त गणेशपार भागातच महावितरण तर्फे लोडशेडिंग केली जात आहे. विजबिलांची पठाणी वसुली करत असलेले महावितरण थोडेसे बिल बाकी असेल तर वीज पुरवठा खंडित करते आहे. परंतु प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या बहुसंख्य ग्राहकांना काही विजचोरांमुळे महावितरण अन्यायकारक लोडशेडिंगची शिक्षा देत आहे. शहरात गणेशपार भागातच वीज चोरी होते काय? इतर भागातही वीजचोरी आहेच परंतु लोडशेडिंग फक्त गणेशपार भागातच होत आहे. वीजचोरी थांबवणे हे महावितरण अधिकाऱ्यांचे कामच आहे, त्याची पगार त्यांना मिळते परंतु चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार परळीचे महावितरणचे अधिकारी करत आहेत. 

परळी शहरात दोन दिवसाआड पाणी येते आणि पाणी आल्यास सकाळी लाईट नसते. सकाळी शाळेत जाणारी मुले, नौकरदार, व्यापारी यांना थंडीचे गार पाण्याने आंघोळ करावी लागत आहे. अती थंडीमुळे आधीच लहान मुले व वृद्ध माणसे आजारी पडत आहेत.  MSEB मुळे विनाकारण त्रास होत आहे. 

ही फक्त गणेशपार भागातील अन्यायकारक लोडशेडिंग त्वरित बंद करण्यात यावी अन्यथा गणेशपार भागातील नागरिकांना घेऊन आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल असा इशारा भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी दिला आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....