दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:■संविधान हाच धर्मग्रंथ -माजी न्यायमूर्ती तिडके

 ■संविधान हाच धर्मग्रंथ -माजी न्यायमूर्ती तिडके





परळी / प्रतिनिधी


सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक लोकशाही प्रधान असलेल्या आपल्या भारत देशात संविधान हाच सर्वांचा धर्मग्रंथ तर जनगणमन हीच सर्वांची प्रार्थना आहे असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी.आर. तिडके यांनी केले.मोहा येथील महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन परळी तालुक्यातील मोहा येथे महाराष्ट्र प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संकुलात मोठ्या हर्ष उल्हास साजरा करण्यात आला महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे, संचालक सुदाम शिंदे, सखाराम शिंदे यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विविध सेवा सोसायटीचे कर्मचारी, विद्यार्थी, पालक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे बोलताना मा. न्यायमूर्ती तिडके म्हणाले ते देशाचा कारभार सुयोग्य पद्धतीने चालावा या करिता मोठ्या मेहनतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान अर्थानं घटना लिहिली. प्रस्तावना,कलम आणि अनुसूची हे आपल्या संविधानाचे तीन भाग असून प्रस्तावनेला संविधानाची उद्देशिका म्हणतात.विद्यमान काळात शासन कर्ते हेच संविधान व घटना बाह्य काम करीत आहेत.संविधान कलम 13 नुसार अनिष्ठ रूढी परंपरा नष्ट करणे आवश्यक असताना शासन कर्ते मात्र अनेक ठिकाणी भूमिपूजन, शासकीय पूजा करताना दिसतात.कलम 14 ही समतेची असून राजकीय मंडळी निवडणुकीत जाती-धर्माचा भेदभाव करून घटनेची पायमल्ली करतात. संविधानाच्या कलम 32 नुसार मूलभूत हक्क सर्वाना असून यात ही शासन कर्ते  सर्वसामान्यांचे मूलभूत हक्क हिरावून घेत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.


या ध्वजारोहण प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना विविध देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक विनायक राजमाने, प्रास्तविक मुकुंद चौधरी तर आभार व्यक्त हनुमंत वाघमोडे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....