प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा




परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)

           येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

          शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे, डॉ विनोद जगतकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर नामविस्तार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ विनोद जगतकर यांनी नामविस्तार करण्यासाठी पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी विधानसभेत ठराव मंजूर केला होता. पण नामविस्तारास विरोध झाल्याने तो ठराव रद्द झाल्याने आंबेडकरी जनतेने मोठे आंदोलन उभारले यासाठी तब्बल१७ वर्षे लढा लढल्यानंतर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आल्याचे डॉ जगतकर यांनी सांगितले. तर अध्यक्षीय समारोप संजय देशमुख यांनी केला. सुत्रसंचालन प्रा.फुटके यांनी तर आभार प्रा.डॉ कल्याणकर यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या