मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS:विद्यापीठ नामांतराचा लढा हा सामाजिक अस्मितेचा होता- प्राचार्य, डॉ संजय वाघमारे

 विद्यापीठ नामांतराचा लढा हा सामाजिक अस्मितेचा होता- प्राचार्य डॉ संजय वाघमारे 


    

परळी वैजनाथ...... जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, 29 वा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी शिवजागृती महाविद्यालय नळेगाव ता.जि.लातूर येथील प्राचार्य , डॉ संजय वाघमारे यांनी विद्यापीठ नामांतराचा लढा हा सामाजिक अस्मितेचा लढा होता असे उद्गार काढले.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.डी व्ही मेश्राम, प्रमुख व्याख्याते प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, विद्यापरिषद सदस्य व लोकनेते गोपीनाथराव मुंडे संशोधन केंद्राचे सदस्य,डॉ.पी एल कराड, उपप्राचार्य प्रा.हरीश मुंडे, आय क्यू ए सीचे समन्वयक डॉ. बी व्ही केंद्रे, पर्यवेक्षिका प्रा. मंगला पेकमवार, समन्वयक प्रा. उत्तम कांदे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.के शेप यांनी नामांतर चळवळीची पार्श्वभूमी सांगून प्रमुख वक्त्याचा परिचय करून दिला. प्रमुख व्याख्याते डॉ.संजय वाघमारे यांनी नामांतर आंदोलन हे 1978 ते इ.स. 1994 या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील 'मराठवाडा विद्यापीठा'ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे  मागणी' या आंदोलनाची होती. शेवटी 17 वर्षाच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नामांतर नव्हे तर नामविस्तार करण्यात आला.बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय - अत्याचार, जुलूम सहन केले. गावोगावी, शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडलेली होती. जिकडे-तिकडे एकाच नारा गुंजत होता “नामांतर झालेच पाहिजे”'.  सरकार नामांतर करत नाही म्हणून बाबासाहेबांच्या नावासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले असे सांगितले .कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी व्ही मेश्राम यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाची सामाजिक चळवळ म्हणून या नामांतर चळवळीकडे पाहिले जाते असे सांगून या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे कसे योग्य होते हे पटवून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. अर्चना चव्हाण तर आभार डॉ. रामेश्वर चाटे यांनी मांडले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....