प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:वैद्यनाथ कॉलेजमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन वक्तृत्व स्पर्धा घेऊन साजरा

 वैद्यनाथ कॉलेजमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन वक्तृत्व स्पर्धा घेऊन साजरा




परळी प्रतिनिधी -वैद्यनाथ कॉलेजमधील विशाखा समितीच्या वतीने अल्पसंख्यांक हक्क दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.  त्यात वकृत्व स्पर्धा घेऊन ॲड.शुभांगी गीते श्री प्रकाश सिंग तुसाम यांच्या उपस्थितीत पोस्टर प्रेसेंटेशन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी व्हि मेश्राम यांनी भूषवले .याप्रसंगी ॲड. शुभांगी गीते, प्रा तुसाम ,प्राध्यापक पेकंमवार, विशाखा समिती प्रमुख डॉ. अर्चना चव्हाण व प्रा.समीर रेणुकादास यांची उपस्थिती होती, मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ,कु. बोडवाले  सोमय्या ,इमानदार फरदीन, सय्यद मोहनीश फातेमा, सय्यद नेहा फातेमा, आदनान शेख ,समीर शेख, रयत रोडे अभिजीत रोडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पोस्टर प्रकाशनामधून अल्पसंख्यांकाची भाषा व संस्कृती विचार यांची मांडणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वकृत्व अल्पसंख्यांकाचे प्रश्न व परिवर्तनाचा प्रभाव असे मुद्दे विषय नमूद करण्यात आले निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती होती .विशाखा समितीने अल्पसंख्याक वर्गातील मुलींना त्यांच्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव याविषयीची माहिती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाची प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.अर्चना चव्हाण यांनी केले तर आभार प्रा.समीर रेणुकादास मानले. या कार्यक्रमासाठी डॉ.आर्या ,प्रा. मस्के ,प्रा. मनोज वाघमारे, डॉ. एम.जी लांडगे यांनी विशेष सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या