परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:जिजाऊ व विवेकानंद जयंतीनिमित्त वैद्यनाथ महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

 जिजाऊ व विवेकानंद जयंतीनिमित्त वैद्यनाथ महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा 



   परळी वैजनाथ,दि.१२- 

                राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथील वैद्यनाथ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.व्ही. मेश्राम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य एच.डी. मुंडे, पर्यवेक्षिका एम. एन. पेकमवार, स्पर्धेचे परीक्षक प्रा.डा. अर्चना चव्हाण, प्रा. डॉ. आर. जे. चाटे, प्रा. दिलीप गायकवाड तसेच संयोजक प्रा.डा. एन. एम. आचार्य आदी मान्यवर उपस्थित होते. 


              प्रारंभी प्राचार्य डॉ.मेश्राम व मान्यवरांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केले व नंतर दीप प्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी प्राचार्य डॉ.डी.व्ही.मेश्राम यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला.  ते म्हणाले- राष्ट्रमाता जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीत देखील  कठोर परिश्रम, अपूर्व त्याग व पुरुषार्थाने बाल शिवबांना मानवतेचे संस्कार देऊन त्यांना जुलमी अन्याय व अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्यास प्रवृत्त केले, तर स्वामी विवेकानंदांनी जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. या दोन्ही महापुरुषांचे आदर्श जीवन युगानुयुगे दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी ठरणारे आहे.                    


        यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत जवळपास दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत अनुक्रमे मनोज मुंडे (प्रथम),कु.चैताली दहिफळे (द्वितीय),कु. शुभम् हांडे(तृतीय), तर राहुल औटी,कु. सुप्रिया रोडे, कु. पल्लवी औटी (उत्त्तेजनार्थ) यांनी पारितोषिके प्राप्त केली. याप्रसंगी पर्यवेक्षिका प्रा. पेकमवार, डॉ. आर. जे.चाटे, प्रा. दिलीप गायकवाड , डॉ. आचार्य, डॉ. चव्हाण  यांनीही विचार मांडले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!