प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:जिजाऊ व विवेकानंद जयंतीनिमित्त वैद्यनाथ महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

 जिजाऊ व विवेकानंद जयंतीनिमित्त वैद्यनाथ महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा 



   परळी वैजनाथ,दि.१२- 

                राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथील वैद्यनाथ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.व्ही. मेश्राम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य एच.डी. मुंडे, पर्यवेक्षिका एम. एन. पेकमवार, स्पर्धेचे परीक्षक प्रा.डा. अर्चना चव्हाण, प्रा. डॉ. आर. जे. चाटे, प्रा. दिलीप गायकवाड तसेच संयोजक प्रा.डा. एन. एम. आचार्य आदी मान्यवर उपस्थित होते. 


              प्रारंभी प्राचार्य डॉ.मेश्राम व मान्यवरांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केले व नंतर दीप प्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी प्राचार्य डॉ.डी.व्ही.मेश्राम यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला.  ते म्हणाले- राष्ट्रमाता जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीत देखील  कठोर परिश्रम, अपूर्व त्याग व पुरुषार्थाने बाल शिवबांना मानवतेचे संस्कार देऊन त्यांना जुलमी अन्याय व अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्यास प्रवृत्त केले, तर स्वामी विवेकानंदांनी जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. या दोन्ही महापुरुषांचे आदर्श जीवन युगानुयुगे दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी ठरणारे आहे.                    


        यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत जवळपास दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत अनुक्रमे मनोज मुंडे (प्रथम),कु.चैताली दहिफळे (द्वितीय),कु. शुभम् हांडे(तृतीय), तर राहुल औटी,कु. सुप्रिया रोडे, कु. पल्लवी औटी (उत्त्तेजनार्थ) यांनी पारितोषिके प्राप्त केली. याप्रसंगी पर्यवेक्षिका प्रा. पेकमवार, डॉ. आर. जे.चाटे, प्रा. दिलीप गायकवाड , डॉ. आचार्य, डॉ. चव्हाण  यांनीही विचार मांडले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या