इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS:बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांचा 2 दिवसाचा संप

 बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांचा 2 दिवसाचा संप




परळी वैजनाथ ,प्रतिनिधी


महा बँकेतील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी संघटनांनी एकत्रित येऊन प्रामुख्याने नोकर भरती आणि द्विपक्षीय वाटाघाटीतून कर्मचारी तसेच अधिकारी यांच्या प्रश्नांची सोडवणूक या प्रश्नावर २७ जानेवारी रोजी एक दिवसाचा संप केला आहे. 


दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्या व्यवस्थापन मंजूर करीत नसल्यामुळे हा संप आता चिघळला आहे. आज दि. ९ आणि १० फेब्रुवारी रोजी पुन्हा संपाची हाक दिली आहे.

डेप्युटी चीफ लेबर कमिशनर मुंबई यांनी मध्यस्थी केल्यानंतरदेखील

व्यवस्थापनाने आपले आडमुठे धोरण कायम ठेवले त्यामुळे कुढलाही तोडगा निघू शकला नाही. या उलट मधल्या काळात बँकेने चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार नाही आणि ते काम आ ऊटसोर्स केले जाईल, अशी भूमिका घेतली व पाच दशकापासून संघटना कार्यालयासाठी बँकेच्या इमारतीत ज्या जागा दिल्या होत्या त्या बळजबरीने ताब्यात घेतल्या. या शिवाय सरक र तसेच चीफ लेबर कमिशनर यानी निर्देश दिल्या नंतर देखिल ट्रेड युनियन अॅक्टमधील तरतुदींचे पालन करत संघटनेच्या निर्वाचित पदाधिकाऱ्यांशी वाटाघटीची तयारी व्यवस्थपनाने दाखविली नाही. या मुळे बँकेतील औद्योगिक संबंध व्यवस्था अधिकच चिघळत गेली आणि त्यातून ९ आणि १० फेब्रुवारी चा संप आता अटळ बनला.

या संपातील अंतर्भूत प्रश्न पुरेशी नोकर भरती याचा ग्राहक सेवेशी प्रत्यक्ष संबंध आहे हे लक्षात  ग्राहकांनी देखिल या संपाला पाठिंबा द्यावा यासाठी संघटनेतर्फे  आवाहन करण्यात आले. हा संप बँकेतील कर्मचारी अधिकारी पृथ्वीराज सोळंके,बालाजी डवरे, पूजा देशमुख,भाग्यश्री साखरे, मीना जोशी, दिपक घाडगे,विलास जोशी, शिवरत्न आघाव यांनी यशस्वी केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....