इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:संत सेवाभाया महाराज हे दिशादर्शक, मानवतावादी, विज्ञानवादी व समतेचे पुरस्कर्ते - अनिल राठोड

 संत सेवाभाया महाराज हे दिशादर्शक, मानवतावादी, विज्ञानवादी व समतेचे पुरस्कर्ते - अनिल राठोड 


परळी प्रतिनिधी 


संत सेवाभाया महाराज हे दिशादर्शक, मानवतावादी, विज्ञानवादी व समतेचे पुरस्कर्ते होते त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत असे प्रतिपादन गोरसेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल बळीराम राठोड यांनी हनुमान मंदिर, थर्मल कॉलनी, परळी येथे जगदगुरु संत सेवालाल महाराज यांच्या २८४ व्या जयंती महोत्सवात मार्गदर्शनात केले. 

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर डी राठोड हे होते. तर मंचावर कार्यकारी अभियंता किशोर राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुभाष राठोड, प्रभारी अधीक्षक अभियंता अरविंद येळे, धनंजय कोकाटे, सतीश मुंडे, आर एस कांबळे, एस बी उद्गार, राष्ट्रीय वीज कर्मचारी सहकारी पतसंस्थाचे संचालक अशोक व्हावळे, भगवान साकसमुद्रे, सुरक्षा अधिकारी सचिन पवार, कुंदन राठोड, प्रदीप चव्हाण, बंडू राठोड, न.प. अग्निशामक दलाचे अधिकारी दिनेश पवार यांच्यासह अनेक उपस्थित होते. दरम्यान जगदगुरु संत सेवालाल महाराज यांच्या २८४ व्या जयंतीनिमित्त एबीसी गेट पासून ते थर्मल कॉलनी येथील हनुमान मंदिर पर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. टीपीएस कॉलोनीतील बंजारा समाज बांधवांनी महाप्रसादाचा (भोजन) लाभ घेतला. मुख्य अभियंता पी एन भदाणे यांनी दूरध्वनी वरून जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मार्गदर्शन करताना अनिल राठोड म्हणाले कि संत सेवाभाया महाराज यांचे मूळ सिद्धांत आजही प्रासंगिक आहेत. नैसर्गिक जीवन जगा, कुणालाही किंवा कोणत्याही प्रकारे भेदभाव करू नका, खोटे बोलू नका, स्त्रियांचा सम्मान करा. अभ्यास करा, ज्ञान मिळवा, अंधश्रद्धेविरुद्ध लढाई करणारे एक बुद्धिप्रामाण्यवादि, विज्ञानवादी, मानवतावादी संत अशी त्यांची ओळख आहे. संत सेवाभाया हे दुरदृष्टी व दिशादर्शक असल्याने त्यांच्या जवळ पशुधन होते. नैसर्गिक आपत्तीचे सर्वात अगोदर आकलन हे पशूला होते. आज बंजारा समाजासमोर अनेक समस्या आहेत परंतु आपण बुद्धिजीवी असल्याने समस्यांच्या समाधानावर व उपायावर चर्चा व्हायला पाहिजे उपस्थितांचे आभार सुरेश पवार यांनी मानले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!