इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS: 🔸राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण: ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन

 🔸राष्ट्रपित्याचे  पुण्यस्मरण: ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे  कीर्तन


आळंदी देवाची.......

        महात्मा गांधी रक्षाविसर्जन स्तंभ, इंद्रायणी काठी, श्री. क्षेत्र आळंदी देवाची, पुणे येथे रविवार, दि. 12 फेब्रुवारी 2023 सकाळी ठीक 8.30 वाजता ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

           30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर देशभरातील प्रमुख नद्यांमध्ये गांधीजींच्या रक्षेचे विर्सजन करण्यात आले. पुण्यभूमी आळंदी येथे 12 फेब्रुवारी 1948 रोजी इंद्रायणी नदीमध्ये गांधीजींच्या अस्थींचे विसर्जन झाले. दरवर्षी 12 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गांधीजींना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. संस्थेतर्फे इंद्रायणी काठी ‘रक्षा विसर्जन स्तंभ’ उभारण्यात आला आहे. गेली 75 वर्षे या परंपरेचे पालन होत आहे. यावर्षी ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. गांधीवादी कार्यकर्ते, वारकरी बांधव, ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक - युवती आणि राष्ट्रपित्याचा आदर करणारे नागरिक अशा समस्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती. आपल्या संपर्कातील समविचारी व्यक्तींना हे निमंत्रण दयावे, असे आवाहन महाराष्ट्र गांधी स्मारक निधी करीत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....