प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:परळी शहरात येणारी अवजड वाहतूक बायपास मार्गे वळवावी -भाजपचे निवेदन

 परळी शहरात येणारी अवजड वाहतूक बायपास मार्गे वळवावी -भाजपचे निवेदन 




परळी वैजनाथ

परळी शहरात व उड्डाणपूलावर वारंवार होणारे जीवघेणे अपघात टाळण्यासाठी शहरातून होणारी जड वहातुक बंद करून बायपास मार्गे वळवणे बाबत परळी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.

परळी शहरात उड्डाणपूल मार्गे राख, वाळू व इतर साहित्य वाहून मोठमोठी वहाने बिनदिक्कत प्रवास करीत आहेत. ही वहाने वेगात चालवली जात असल्यामुळे कायम अपघात होत असतात. कालच उड्डाणपूलावर घडलेल्या एका मोठ्या अपघातात परळीतील भीमनगर येथील आशिष ताटे व राजेश पोटभरे हे दोन युवक ठार झाले. असे अपघात वारंवार शहरात घडत आहेत. यापूर्वीही अनेक अपघात उड्डाणपुलावर घडले असून अनेकांना जीव गमवावा लागला किंवा अपंगत्व आले आहे. परळी शहरातून उड्डाणपुलमार्गे प्रवास करणाऱ्या भेल स्कुल, न्यू हायस्कूल शाळा, विद्यावर्धिनी शाळेतील अनेक विदयार्थ्यांच्या तसेच थर्मल पॉवर स्टेशन व इतर कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांच्या जीवाला अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. 

परळी बायपास रोड पूर्ण झाला असून जड वाहनांच्या वाहतूकीस शहरातून पूर्णपणे बंदी घालून बायपास मार्गे वळवली तर अपघात बंद होतील असे अश्विन मोगरकर यांनी या निवेदनात नमूद केले आहे.

जड वाहनांवर शहरातून होणारी वाहतूक त्वरित बंद करावी या मागणीचे निवेदन परळी भारतीय जनता पार्टीतर्फे बुधवार दि 8 मार्च रोजी संभाजीनगर पोलीस स्टेशनला देण्यात आले यावेळी भाजपाचे शहर उपाध्यक्ष महादेव ईटके, रमेश गायकवाड, अश्विन मोगरकर, अच्युत जोगदंड, दीपक जगतकर, सुशील हरंगुळे, उमेश निळे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या