इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:आमदार शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - सुषमा अंधारे

 आमदार शिरसाट यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - सुषमा अंधारे




परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा..

      आमदार संजय शिरसाट यांनी माझ्यावर टीका करतांना जी आर्वाच्य भाषा वापरली, माझी बदनामी केली या प्रकरणी मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी परळीत पत्रकारांशी बोलतांना सांगितले. याशिवाय परळी पोलिसांत देखील त्यांच्याविरुद्ध बदनामी केल्याप्रकरणी तक्रार देण्यास सुषमा अंधारे गेल्या मात्र पोलीसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यास नकार दिला.


        शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपुर्वी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. ती करत असतांना लफडेबाज असा उल्लेख केल्यामुळे शिरसाट यांच्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दरम्यान, परळी दौऱ्यावर असलेल्या अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत या विषयावर भाष्य केले. अंधारे म्हणाल्या, आमदार संजय शिरसाट यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. परळी पोलीस ठाण्यात बदनामी केल्याबदल  तक्रार दाखल करण्यासाठी त्या गेल्या मात्र पोलीसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यास नकार दिला. यानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाटांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे. मी विरोधकांना प्रश्न विचारताना अत्यंत सन्मानाने बोलते, कारण माझ्यावर माझ्या कुटूंबाचे चांगले संस्कार झालेले आहेत.सभ्य व सुसंस्कृत नेतृत्वाच्या आदेशाने मी काम करते. आमदार संजय शिरसाटांना भाऊ म्हणलेले का टोचले ? आतापर्यंत अजित पवार यांना दादा म्हणलेले कधी टोचले नाही. कारण ते सज्जन व सभ्य संस्कृतीतील आहेत. ज्यांना सभ्यता कशाशी खातात हेच माहिती नाही त्या शिरसाटांना भाऊ म्हणलेले टोचले असेल. मुळात यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत गलिच्छ आहे.


        यामुळे माझ्या पक्षाने विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र कुठेही पोलीसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. मी कायद्याची अभ्यासक आहे, त्यांनी बोललेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मला चांगला कळतो. त्यामुळे शिरसाटांवर गुन्हा दाखल व्हायलाच हवा. परंतु मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचा पोलीसांवर दबाव आहे असे त्यांनी सांगितले.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!