इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजच्या युगात प्रेरणादायी-- प्राचार्य डॉ जे व्ही जगतकर

 यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजच्या युगात प्रेरणादायी-- प्राचार्य डॉ जे व्ही जगतकर



 परळी प्रतिनिधी ---जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली . त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजच्या युगात प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यासकेंद्राचे केंद्र संयोजक व इतिहास विभाग प्रमुख  डॉ.  बाबासाहेब शेप यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला. तर महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केद्र प्रमुख डॉ. जे. व्ही. जगतकर यांनी यशवंतराव चव्हाण यांचे विचार प्रेरणादायी होते ते आजच्या युगात आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र राज्यात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना विविध प्रकारच्या सुधारणा करून महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या कार्यामुळेच मुक्त विद्यापीठाला यशवंतराव चव्हाण हे नाव देण्यात आले असावे असे वाटते. यावेळी या कार्यक्रमाला केंद्र संयोजक, डॉ.बी. के. शेप, केंद्र सहाय्यक प्रोफेसर, डॉ. आर. डी. राठोड, आय क्यू एसी समन्वयक डॉ.बी. व्ही. केंद्रे, प्रोफेसर डॉ.व्ही. बी. गायकवाड, प्रा समीर रेणूकादास, डॉ. टी. ए. गित्ते, पर्यवेक्षक प्रा. मंगला पेकमवार, प्रा. राजू गोरे, प्रा. मनोज फड, प्रा. मोकळे, प्रा. लोखंडे, श्री प्रभाकर मुंडे, जी बी किटे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रसंयोजक डॉ. बी के शेप तर आभार प्रोफेसर डॉ. आर. डी. राठोड यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या