इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS:यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजच्या युगात प्रेरणादायी-- प्राचार्य डॉ जे व्ही जगतकर

 यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजच्या युगात प्रेरणादायी-- प्राचार्य डॉ जे व्ही जगतकर



 परळी प्रतिनिधी ---जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली . त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजच्या युगात प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यासकेंद्राचे केंद्र संयोजक व इतिहास विभाग प्रमुख  डॉ.  बाबासाहेब शेप यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला. तर महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केद्र प्रमुख डॉ. जे. व्ही. जगतकर यांनी यशवंतराव चव्हाण यांचे विचार प्रेरणादायी होते ते आजच्या युगात आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र राज्यात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना विविध प्रकारच्या सुधारणा करून महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या कार्यामुळेच मुक्त विद्यापीठाला यशवंतराव चव्हाण हे नाव देण्यात आले असावे असे वाटते. यावेळी या कार्यक्रमाला केंद्र संयोजक, डॉ.बी. के. शेप, केंद्र सहाय्यक प्रोफेसर, डॉ. आर. डी. राठोड, आय क्यू एसी समन्वयक डॉ.बी. व्ही. केंद्रे, प्रोफेसर डॉ.व्ही. बी. गायकवाड, प्रा समीर रेणूकादास, डॉ. टी. ए. गित्ते, पर्यवेक्षक प्रा. मंगला पेकमवार, प्रा. राजू गोरे, प्रा. मनोज फड, प्रा. मोकळे, प्रा. लोखंडे, श्री प्रभाकर मुंडे, जी बी किटे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रसंयोजक डॉ. बी के शेप तर आभार प्रोफेसर डॉ. आर. डी. राठोड यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....