•••••••••••••••
दर्जा व विश्वासपूर्ण माहिती -आपल्या हक्काचे व्यासपीठ -प्रत्येकाची 'माझी बातमी'
•••••••••••••••
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
-
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३ नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
MB NEWS:धनंजय मुंडेंची विधानसभेत मागणी
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
-
12 हजार शेतकऱ्यांचे बँकखाते गोठवले:सर्व शेतकऱ्यांचे सीबील बिघडणार नाही याची काळजी घेऊन बँकखाते पूर्ववत करून द्या !
धनंजय मुंडेंची विधानसभेत मागणी
मुंबई (दि. 02) - बीड जिल्ह्यातील बारा हजार शेतकऱ्यांचे बँक खाते बजाज आलियांज या विमा कंपनीने चुकीचा पीक विमा जमा झाल्याचे कारण देत गोठवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला तसेच त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या सिबिलवरही झाला. अशा प्रकारे शेतकऱ्यांचे बँक खाते बँकेला कळवून गोठवणे हे बेकायदेशीर असून संबंधित कंपनीवर शासनाने गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली आहे.
खरीप हंगाम 2022 मधील विमा धारक शेतकऱ्यांपैकी सुमारे 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 12 कोटी रुपये रक्कम बजाज अलियांज विमा कंपनीने जमा केले होते. मुळात शेतकऱ्यांना पात्र असूनही विमा मिळत नाही आणि त्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले तर एवढा मोठा व्यवहार करणारी विमा कंपनी जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून पैसे आल्याचे सांगते हे अत्यंत अव्यवहार्य आहे असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी नमूद केले.
ऐन अडचणीच्या काळात बँक खाते गोठवल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या खात्यावरील जमा पैसे उचलता येत नव्हते. त्या काळात विमा जमा झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता ते 12 हजार शेतकरी नेमके कोणते, याबाबतही संभ्रम असल्याने अनेक शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला. तसेच विमा कंपनीच्या चुकीच्या वसुली धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सिबिलवरही परिणाम झाला व त्याचा त्रास भविष्यात शेतकऱ्यांना कर्ज घेताना होऊ शकतो.
त्यामुळे विमा कंपनीच्या या बेकायदेशीर कारवाई विरुद्ध राज्य शासनाने विमा कंपनी विरोधात गुन्हे दाखल करावेत, तसेच संबंधित शेतकऱ्यांच्या सिबिलवर कोणताही परिणाम होणार नाही, याबाबत आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश विमा कंपनीला द्यावेत व विमा कंपनीने केलेल्या चुकीमुळे शेतकऱ्यांना जो त्रास झाला, त्याबाबत विमा कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी केली. यावर राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची नोंद घेतली असून योग्य ती कारवाई तातडीने केली जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले.
परळीत राडा: तुंबळ हाणामारीत एक ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... तुंबळ हाणामारीत परळीत राडा झाला. यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना परळीतील बरकत नगर भागात घडली आहे. कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर दोन गटात हाणामारी झाली. यात एकाला जीव गमवावा लागला आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार एका समारंभात हा राडा झाल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अचानक वाद झाला हा वाद मारामारीपर्यंत पोहचला. यामध्ये एकजण ठार झाला आहे.अल्लाउद्दीन शेख रा.नागापूर असे मयत ईसमाचे नाव आहे.दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला.पोलीस घटनास्थळावर पोहचले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या मारामारी मध्ये मयत झालेले इसम अल्लाउद्दीन शेख हे नागापूर येथील रहिवासी असून नागापूर येथे त्यांची पान टपरी आहे. नागापूर परिसरात ते सर्व परिचित असून या हाणामारीत त्यांना आपला जीव गमवावा लागला...
केजनंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अपहरणाची घटना; परळीतील प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याचे अपहरण परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा.. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार ताजा असतानाच काल (दि.9) रात्री परळी शहरातील प्रतिष्ठित युवा उद्योजक- व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या अपहरण प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया परळी शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे. या खळबळजनक घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, परळी शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे चिरंजीव अमोल डुबे यांचे औद्योगिक वसाहत येथे उद्योग व व्यापारीपेढी आहे. नेहमीप्रमाणे ते काल रात्री आपल्या ऑफिसमधून बाहेर मोटरसायकलवर बसत असताना अज्ञात पाच ते सहा लोकांनी येऊन त्यांना बळजबरी उचलून गाडीत टाकले व अंबाजोगाईच्या दिशेने घेऊन गेले. दरम्यान त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत ती रक्कम सुपूर्द करा, मग तुम्हाला सोडून देतो असे त्यांना सांगण्यात आले. घाबरून जाऊन ...
आवादा कंपनीच्या कामगाराचा केज येथे मृत्यू केज :- केज तालुक्यातील बहुचर्चित आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील पंजाबच्या मजुराचा केज येथील रोडवर मृत्यू झाला आहे.मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. पंजाब राज्यातील हा कामगार केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे.केज शहरातील केज अंबाजोगाई रोडवर असलेल्या एका बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले.केज पोलिसांनी हा मृतदेह पीएम करण्यासाठी ताब्यात घेतला आहे.या प्रकरणाचा तपास केज पोलीस करत आहेत.
परळीत पुन्हा आणखी एक 'हैवानी' कृत्य: अल्पवयीन मुलीवर विकृत पद्धतीने बलात्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... परळी रेल्वे स्थानकात सहा वर्षीय चिमुरडी वरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता परळीत पुन्हा आणखी एक हैवानी कृत्य समोर आले आहे. या प्रकारातही एका अल्पवयीन मुलीला गल्लीतीलच चार विकृतांनी उचलून नेऊन तिच्यावर विकृत पद्धतीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असुन या घटनेची हकीकत चीड आणणारी आहे. याबाबत चार जणाविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. परळी शहरातील बरकतनगर भागात घडलेल्या या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आणि संतापजनक घटनेची पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहिती अशी की, बरकतनगर भागातील एका अल्पवयीन केवळ बारा वर्षाच्या मुलीला ती दुकानावर गेलेली असताना रस्त्यात तिला उचलून नेले. अंधारात एका आड मार्गावरील पांदणीत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याच गल्लीत राहणाऱ्या हैवानी वृत्तीच्या चार युवकांनी ठरवून या मुलीला उचलले व तिला पांदणीत नेले. चारपैकी दोन आरोपींनी ...
परळी बीड रस्त्यावर भीषण अपघात दोन जण जागीच ठार ;एक जखमी परळी वैजनाथ,प्रतिनिधी - परळी- बीड रस्त्यावरील पांगरी गावाजवळ टिप्परने एका बुलेटला जोराची धडक देऊन उडवल्याने घडलेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत.तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात आज सायंकाळी 6:30 च्या सुमारास घडला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की रक्ताच्या थारोळ्यात या गाडीवरील मोटर सायकल स्वार पडले आहेत. मयत इसम परळी तालुक्यातील जळगाव येथील सरपंच वसंत ताराचंद चव्हाण असुन या अपघातात एका चिमुकलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. आपघातस्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. नातीवर उपचार करुन जात होते गावाकडे: काळाने घातला घाला.... या आपघातात जळगव्हाण चे सरपंच वसंत ताराचंद चव्हाण (वय ५५) व त्यांची नात श्रुती विजय चव्हाण (वय ८ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पत्नी कस्तुराबाई वसंत चव्हाण या गंभीर जखमी आहेत. परळी येथील खासगी रुग्णालयात नात श्रुती वर दुपारी उपचार करुन गावाकड...
बीड पं.स.च्या विस्तार अधिकाऱ्याची परळीत गळफास घेऊन आत्महत्या परळी वैजनाथ,प्रतिनिधी : परळी वैजनाथ शहरातील शिवाजीनगर परिसरात बीड पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असणारे विस्तार अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास कळाली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, परळी वैजनाथ शहरातील शिवाजीनगर भागात वास्तव्यास असलेले व बीड पंचायत समिती कार्यालयातील विस्तार अधिकारी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकिस आली आहे. विलास डोगरे असे आत्महत्या ग्रस्त व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्याचे कारण मात्र समजले नाही. विलास डोगरे यांच्या पाश्चत तीन मुली, आई पत्नी, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विलास डोगरे यांनी परळी पंचायत समिती कार्यलया अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचाय मध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा बजवाली आहे. धर्मापुरी , सिरसाळा, कन्हेवाडी ,अशा अनेक गावांत त...
परळी वैजनाथ- नंदागौळ रस्त्यावर भीषण अपघात: वसंतनगरचा युवक गंभीर जखमी दुचाकी व एसटी बसमडध्ये धडक; अपघातात पाय निघाला बाजूला, उपचारासाठी रुग्णालयात दाखल परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा... परळी ते नंदागौळ रस्त्यावर आज झालेल्या भीषण अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पट्टीवडगाव-परळी एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत अनिल प्रेमदास राठोड (वय 27, रा. वसंतनगर, परळी) या युवकाचा पाय बाजूला निघून गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून समजते. धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकी दूर फेकली गेली आणि राठोड यांच्या पायाला गंभीर इजा झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पाय शरीरापासून वेगळा झाला असून त्यांना अतिशय वेदनादायक अवस्थेत तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला मदतीसाठी पुढे सरसावले. अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून बस चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...
उद्या(26मे)पासून परळीतील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामे सुरु होणार पण... परळी वैजनाथ, प्रतिनिधी... येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती चे काम उद्या दिनांक 26 मे पासून सुरू करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग लातूर यांनी दोन दिवसापूर्वीच पत्र जारी करून माहिती दिलेली आहे. त्या अनुषंगाने हे काम दिनांक 26 मे पासून पुढे एक महिना म्हणजेच 30 जून पर्यंत सुरू राहणार आहे. परंतु उड्डाण पुलावरील वाहतूक बंद करण्याबाबतच्या निर्णयात अंशतः बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता पुढील सहा दिवस म्हणजेच 31 मे पर्यंत उड्डाण पुलावरील वाहतूक सुरू राहणार आहे. एक जून नंतर मात्र संपूर्णतः उड्डाणपुलावरील वाहतूक बंद असणार आहे. डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी तब्बल एक महिन्यापेक्षा अधिक दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकतीच जारी केली होती.त्यानुसार काम सुरु होणार असले तरी 31 तारखेपर्यंत उड्डाणपुलावरुन वाहतूकही सुरु ठेवण्यात येणार आहे.परळी वैजनाथ शहरातील डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी ...
परळी व अंबाजोगाई भागात दहशत घालणाऱ्या एका टोळीवर मोक्का ! बीड : बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राखण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधोक्षक नवनीत कॉवत यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुन्हेगारीचे व गुंडगिरीचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MCOCA व MPDA व कलम 55,56,57 मपोका अन्वये बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचा धडाका बीड जिल्हाचे पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली बीड पोलीसांनी सुरु ठेवला आहे. जनतेच्या जिविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी जिल्हयात चोऱ्या, दरोडे, घरफोड्या, खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडयाची तयारी, बलात्कार, जुलुमाने घेणे, पळवून नेणे, खंडणी मागणे या व अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द ठोस कारवाई करण्यासाठी बीड जिल्हयातील पोलीस जिल्हयातील व जिल्हाचे बाहेरील गुन्हेगारावर करडी नजर ठेऊन आहेत. दिनांक 01/03/2025 रोजी न्यायालयाचे आदेशान्वये पो.स्टे. परळी शहर गुरनं 44/2025 कलम 307, 326,392, 394,323, 324, 504,...
परळी जवळ पावनणेचार लाखांचा गुटखा पकडला परळी (प्रतिनिधी) धर्मापुरी येथुन परळीकडे आणण्यात येत असलेला ४ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा गुटखा परळी ग्रामीण पोलिसांनी शुक्रवार दि.१० जानेवारी रोजी रात्री पकडला.याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात बंदी घातलेल्या गुटख्याची परळी शहरात सर्रासपणे विक्री होत असते.परळी हे गुटखा विक्रीचे केंद्र बनले होते.जिल्हा पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी पदभार घेताच बीड जिल्ह्यात गुटखाबंदी केल्यानंतरही परळी शहरात गुटख्याची आवक सुरुच आहे.धर्मापुरी येथुन परळीकडे गुटखा येत असल्याची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक चोरमले यांच्या पथकाने परळी-धर्मापुरी मार्गावरील सिमेंट फॅक्ट्रीजवळ नवनाथ हरगावकर,आर.पी.केकान,जी.ए.येलमटे,जी.व्ही.भताने,आर.टी.मुंडे, यांच्या पथकाने वाहनांची तपासणी केली असता शुक्रवार दि.१० जानेवारी रोजी रात्री ८.५० वाजता हुंडाई कार क्र.एम.एच.३८ झेड २१२१ या कारमधून धर्मापुरीहुन परळीकडे आणण्यात येत असलेला २ लाख १० हजार ६०० रुपयांचा विमल पानमसाला,५२ हजार ५०० रुपयांचा नवरत्न पान मसाला,५३ हजार ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा