इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:जगद्गुरू पंचाचार्य युगमानोत्सव :पौरोहित्य करणाऱ्या स्वामींचा सत्कार

 जगद्गुरू पंचाचार्य युगमानोत्सव :पौरोहित्य करणाऱ्या स्वामींचा सत्कार 


श्रीमद काशी जगद्गुरु श्री श्री श्री 1008 डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या आज्ञानुसार समस्त वीरशैव समाज आयोजित जगद्गुरू पंचाचार्य युगमानोत्सव जयंती  कार्यक्रमामध्ये प्रत्येक पूजा विधी ज्यांच्या शिवाय संपन्न होत नाही.प्रत्येक कार्यात ज्यांचे मोलाचे योगदान असणारे मठपती दयानंद स्वामी. धनंजय स्वामी.. महेश स्वामी.. शशिकांत स्वामी योगेश स्वामी.. सोमनाथ स्वामी आणि भीमाशंकर स्वामी सर्व स्वामींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली

             पंचकलशाची पूजा करुन श्रीमद जगद्गुरू पंचाचार्याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले महाराष्ट्र वीरशैव सभा शाखेच्या बीड जिल्हाध्यक्षा सौ सुरेखाताई मेनकुदळे, माजी नगराध्यक्षा सौ सरोजिनीताई हालगे,श्री वैद्यनाथ भजनी मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती गोदावरीबाई चौधरी,शंभु महादेव सेवाभावी भजनी मंडळाच्या अध्यक्षा सौ रमाताई आलदे,जगद्गुरू रेणुकाचार्य जयंती चे आयोजन करणाऱ्या सौ शिवकन्याताई निर्मळे तसेच सौ अन्नपूर्णाताई निर्मळे व सौ सुवर्णाताई ओपळे यांच्या हस्ते सर्व अतिथी स्वामींची पाद्यपूजा करुन स्वामींना शाल, हार, श्रीफळ तसेच पंचाचार्यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच  श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आदरणीय सौ सुरेखाताईंचा शाल, हार, श्रीफळ तसेच पंचाचार्यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला  मंगलआरती  करून प्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशी पिठाच्या केंद्र संचालिका सौ चेतनाताई गौरशेटे यांनी केले. सूत्रसंचालन सौ ज्योतीताई बर्दापुरे यांनी केले तर सौ विद्याताई स्वामींनी आभार मानले  या कार्यक्रमाला असंख्य भक्तगणांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व भजनी मंडळाने परिश्रम घेतले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या