इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:खरिपातील अतिवृष्टीची मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

 धनंजय मुंडेंच्या सभागृहातील दणक्यानंतर प्रशासन खडबडून जागे, अनुदान वितरण करण्यास सुरुवात!




खरिपातील अतिवृष्टीची मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात


बीड (दि. 21) - अवकाळीची मदत तर दूरच, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे 410 कोटी अद्याप मिळाले नाहीत असा आरोप करत धनंजय मुंडे यांनी विधानसभा सभागृह दणाणून सोडले होते. त्यानंतर अवघ्या 24 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी काळातील मदतीचे वितरण सुरू झाले आहे. 


खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने जे नुकसान केले, त्या नुकसानीच्या भरपाई पोटी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनास सादर केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे शासनाने 410 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती, मात्र याला चार महिने उलटले, दिवाळी तर सोडाच पण आता पाडवा आला तरी त्या मदतीचे अद्याप वितरण नाही, कधी सॉफ्टवेअर तर कधी डेटा तर कधी काही अडचणी सांगितल्या जातात, यावरून धनंजय मुंडे यांनी सोमवारी सरकारला धारेवर धरले होते. 


यावेळी अवकाळी पावसामुळे सध्या जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे तर करूच मात्र मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीची रक्कम तातडीने वितरित करण्यात येईल, असे आश्वासन सरकार पक्षाच्या वतीने देण्यात आले होते; त्यानंतर सूत्रे तातडीने हलली व आज लगेचच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या