इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील कामगार पाल्यांना लाभ

 संगणक शिक्षणासाठी कामगार पाल्यांना २ लाखाचे अर्थसहाय्य मंजूर 

बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील कामगार पाल्यांना लाभ


परळी (प्रतिनिधी) : 

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने एम.एस.सी-आयटी हा संगणक कोर्स करणाऱ्या कामगार व कामगार पाल्यांना दरवर्षी आर्थिक सहाय्य केले जाते.

बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ९२ कामगार व कामगार पाल्यांनी एम.एस.सी-आयटी हा संगणक कोर्से उत्तीर्ण केल्यामुळे त्यांना कामगार कल्याण मंडळातर्फे अर्थसहाय्य मंजुर करण्यात आले.

कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संगणकाचे ज्ञान व्हावे, एम.एस.सी-आयटी हा कोर्स पूर्ण करून व्यवसाय करता यावा तसेच रोजगार उपलब्ध होण्यासाठी या योजनेंतर्गत अर्थसहाय्य करून प्रोत्साहन दिले जाते.

यंदाच्या वर्षात बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ९२ कामगार पाल्यांना २ लाख २ हजार ९५० रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. मंजूर करण्यात आलेली रक्कम लाभार्थींच्या वैयक्तिक बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.


---‐------‐----------------------------------------

कामगारांची मुले संगणक शिक्षणात पुढे यावी. संगणक शिक्षणातून आर्थिक सक्षम व्हावी म्हणुन ही योजना राबविण्यात येते.

कामगारांच्या घरातील सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा. 

-भालचंद्र जगदाळे,

कामगार कल्याण अधिकारी.

‐---------------------------------------------------


कामगार व कामगार पाल्यांनी  एम.एस सी-आयटी हा कोर्स ६० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्यास व संगणक शिक्षण घेण्यासाठी  भारलेल्या फीसच्या ५० टक्के रक्कम अर्थसहाय्य म्हणून दिली जाते. या योजनेचा अर्ज दरवर्षी जुलै ते डिसेंबर दरम्यान ऑनलाईन पध्दतीने भरणा करावा  लागतो. या योजनेचा लाभ कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केलेले कामगार घेऊ शकतात.

                 -आरेफ शेख 

केंद्र संचालक ,कामगार कल्याण केंद्र.

-----------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या