इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:शिंदे सरकारच्या भोगळ कारभाराचे १५० पी.एचडी. संशोधक बळी

 शिंदे सरकारच्या भोगळ कारभाराचे १५० पी.एचडी. संशोधक बळी

अपात्र मागासवर्गीय संशोधकाचा सरकारला आत्महदनाचा इशारा


नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रातून १५० मागासवर्गीय पी.एचडी.संशोधक विद्यार्थ्यांना नागपूरच्या महाज्योती संस्थेने अपात्र ठरवित त्यांना फेलोशिप नाकारुन त्यांच्या सर्वाच्च संशोधनाचा मार्गच बंद केला असून शिंदे सरकारच्या भोगळ कारभाराचे हे १५० विद्यार्थी संशोधक बळी ठरले आहेत. पी.एचडी. नोंदणीच्या तारखेचा विद्यापीठांनी केलेला घोळ हा विद्यार्थ्यांच्या नुकसानाला कारणीभूत ठरला आहे. फक्त नोंदणीचा दिनांक चुकीचा ठरवित १५० मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फेलोशिप नाकारण्यात आली आहे. या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी अपात्र संशोधकांनी महाज्योती, स्थानिक विद्यापीठाचे कुलगुरु, मंत्री महोदय सावे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस , मुख्यमंत्री शिंदे  यांच्या पर्यंत प्रत्येक बाबीचा पाठपुरावा केला. त्यांना यात विद्यार्थ्यांची कोणतीही चुक नाही हे निदर्शनास आणून दिले. मात्र सरकारने संशोधकांची बाजू ऐकली नाही. फक्त आश्वासन दिले.

फंड आला की देतो, सरकार सोबत चर्चा करतो, तुमचे काम नक्कीच होणार अशी आश्वासने आता पर्यंत दिली आहे. मात्र आता आश्वासनाची वेळ निघून गेली असून, आता १५० अपात्र संशोधकांनी फेलोशिपकरीता मात्र ठरविण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून आमरण उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा सरकारला दिला आहे. शिंदे सरकारने सरळ सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरुंना सरकारने ठेवला नाही. बोलावून त्यांना संशोधकांच्या फेलोशिपमध्येअडचण ठरलेली चुकीची नोंदणी दिनांक व्यवस्थित करुन देण्याचा आदेश द्यावा अशी मागणी सुद्धा पात्र संशोधक करीत आहेत. ज्याप्रमाणे सारथी, बार्टीने नोंदणी दिनांकाची चुक मान्य करीत सर्वच संशोधकांना फेलोशिप मान्य केली त्याच धर्तीवर महाज्योतीसुद्धा १५० अपात्र संशोधकांना न्याय द्यावा. विशेष बाब म्हणजे, या अपात्र संशोधकांमध्ये मोठया प्रमाणात गरीब वर्गातील महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आता तरी सरकारने १५० अपात्र विद्यार्थ्यांच्या समस्येचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा अन्यथा आंदोलनाशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच नाही.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या