परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:शिंदे सरकारच्या भोगळ कारभाराचे १५० पी.एचडी. संशोधक बळी

 शिंदे सरकारच्या भोगळ कारभाराचे १५० पी.एचडी. संशोधक बळी

अपात्र मागासवर्गीय संशोधकाचा सरकारला आत्महदनाचा इशारा


नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रातून १५० मागासवर्गीय पी.एचडी.संशोधक विद्यार्थ्यांना नागपूरच्या महाज्योती संस्थेने अपात्र ठरवित त्यांना फेलोशिप नाकारुन त्यांच्या सर्वाच्च संशोधनाचा मार्गच बंद केला असून शिंदे सरकारच्या भोगळ कारभाराचे हे १५० विद्यार्थी संशोधक बळी ठरले आहेत. पी.एचडी. नोंदणीच्या तारखेचा विद्यापीठांनी केलेला घोळ हा विद्यार्थ्यांच्या नुकसानाला कारणीभूत ठरला आहे. फक्त नोंदणीचा दिनांक चुकीचा ठरवित १५० मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फेलोशिप नाकारण्यात आली आहे. या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी अपात्र संशोधकांनी महाज्योती, स्थानिक विद्यापीठाचे कुलगुरु, मंत्री महोदय सावे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस , मुख्यमंत्री शिंदे  यांच्या पर्यंत प्रत्येक बाबीचा पाठपुरावा केला. त्यांना यात विद्यार्थ्यांची कोणतीही चुक नाही हे निदर्शनास आणून दिले. मात्र सरकारने संशोधकांची बाजू ऐकली नाही. फक्त आश्वासन दिले.

फंड आला की देतो, सरकार सोबत चर्चा करतो, तुमचे काम नक्कीच होणार अशी आश्वासने आता पर्यंत दिली आहे. मात्र आता आश्वासनाची वेळ निघून गेली असून, आता १५० अपात्र संशोधकांनी फेलोशिपकरीता मात्र ठरविण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून आमरण उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा सरकारला दिला आहे. शिंदे सरकारने सरळ सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरुंना सरकारने ठेवला नाही. बोलावून त्यांना संशोधकांच्या फेलोशिपमध्येअडचण ठरलेली चुकीची नोंदणी दिनांक व्यवस्थित करुन देण्याचा आदेश द्यावा अशी मागणी सुद्धा पात्र संशोधक करीत आहेत. ज्याप्रमाणे सारथी, बार्टीने नोंदणी दिनांकाची चुक मान्य करीत सर्वच संशोधकांना फेलोशिप मान्य केली त्याच धर्तीवर महाज्योतीसुद्धा १५० अपात्र संशोधकांना न्याय द्यावा. विशेष बाब म्हणजे, या अपात्र संशोधकांमध्ये मोठया प्रमाणात गरीब वर्गातील महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आता तरी सरकारने १५० अपात्र विद्यार्थ्यांच्या समस्येचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा अन्यथा आंदोलनाशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच नाही.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!