दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:शिंदे सरकारच्या भोगळ कारभाराचे १५० पी.एचडी. संशोधक बळी

 शिंदे सरकारच्या भोगळ कारभाराचे १५० पी.एचडी. संशोधक बळी

अपात्र मागासवर्गीय संशोधकाचा सरकारला आत्महदनाचा इशारा


नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रातून १५० मागासवर्गीय पी.एचडी.संशोधक विद्यार्थ्यांना नागपूरच्या महाज्योती संस्थेने अपात्र ठरवित त्यांना फेलोशिप नाकारुन त्यांच्या सर्वाच्च संशोधनाचा मार्गच बंद केला असून शिंदे सरकारच्या भोगळ कारभाराचे हे १५० विद्यार्थी संशोधक बळी ठरले आहेत. पी.एचडी. नोंदणीच्या तारखेचा विद्यापीठांनी केलेला घोळ हा विद्यार्थ्यांच्या नुकसानाला कारणीभूत ठरला आहे. फक्त नोंदणीचा दिनांक चुकीचा ठरवित १५० मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फेलोशिप नाकारण्यात आली आहे. या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी अपात्र संशोधकांनी महाज्योती, स्थानिक विद्यापीठाचे कुलगुरु, मंत्री महोदय सावे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस , मुख्यमंत्री शिंदे  यांच्या पर्यंत प्रत्येक बाबीचा पाठपुरावा केला. त्यांना यात विद्यार्थ्यांची कोणतीही चुक नाही हे निदर्शनास आणून दिले. मात्र सरकारने संशोधकांची बाजू ऐकली नाही. फक्त आश्वासन दिले.

फंड आला की देतो, सरकार सोबत चर्चा करतो, तुमचे काम नक्कीच होणार अशी आश्वासने आता पर्यंत दिली आहे. मात्र आता आश्वासनाची वेळ निघून गेली असून, आता १५० अपात्र संशोधकांनी फेलोशिपकरीता मात्र ठरविण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून आमरण उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा सरकारला दिला आहे. शिंदे सरकारने सरळ सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरुंना सरकारने ठेवला नाही. बोलावून त्यांना संशोधकांच्या फेलोशिपमध्येअडचण ठरलेली चुकीची नोंदणी दिनांक व्यवस्थित करुन देण्याचा आदेश द्यावा अशी मागणी सुद्धा पात्र संशोधक करीत आहेत. ज्याप्रमाणे सारथी, बार्टीने नोंदणी दिनांकाची चुक मान्य करीत सर्वच संशोधकांना फेलोशिप मान्य केली त्याच धर्तीवर महाज्योतीसुद्धा १५० अपात्र संशोधकांना न्याय द्यावा. विशेष बाब म्हणजे, या अपात्र संशोधकांमध्ये मोठया प्रमाणात गरीब वर्गातील महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आता तरी सरकारने १५० अपात्र विद्यार्थ्यांच्या समस्येचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा अन्यथा आंदोलनाशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच नाही.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....