इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:शेतकरी कीर्तन महोत्सव हे क्रांतिकारी पाऊल-शेतकरी कवी इंद्रजित भालेराव

 शेतकरी कीर्तन महोत्सव हे क्रांतिकारी पाऊल-शेतकरी कवी इंद्रजित भालेराव





परळी / प्रतिनिधी


शेतक-यांना न मागता कर्जमुक्ती देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त कान्नापूर ता:धारुर जि. बीड या ठिकाणी दि.०३ मार्च ते दि. ०९ मार्च हे सात दिवस परिसरातील चौदा गावांनी मिळून शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कीर्तन महोत्सवाची सुरवात०३ मार्च रोजी आयुष्याभर शेतक-यांच्या व्यथा-वेदना कवितेतून मांडणारे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, वारकरी कीर्तन परंपरेचा अविभाज्य भाग असणाऱ्या पखवाज या  वाद्याला अंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून देणारे उद्धवबापू आपेगावकर यांच्या उपस्थितीत झाली. या सोहळ्याला संबोधित करताना वरील उद्गार इंद्रजीत भालेराव यांनी काढले. 900 वर्षांपूर्वी ज्या उद्देशाने वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली तो उद्देश आता मात्र बाजूला राहून त्याची जागा दांभिकता, कर्मकांड आणि पाखंडाने घेतलेली आहे; म्हणून समाजातील जागरूक व्यक्तींनी पुढाकार घेऊन अशा कीर्तन महोत्सवाचे आयोजन करणे हा एक क्रांतिकारक उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगतानाच त्यांनी संत नामदेवापासून, बसवेश्वर, चक्रधर ते संत तुकाराम पर्यंत सर्व संतांच्या वचनांचे प्रमाण देऊन आपल्या कर्तव्याला प्राथमिकता देणे हा विचार किती महत्त्वाचा हे लक्षात आणून दिले. सध्याच्या पोटभरू परमार्थाबद्दल उद्धव बापू आपेगावकर यांनी शेलक्या शब्दात परखड प्रहार केले. त्याचवेळी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचा शेतकऱ्यांनीच मोल भाव करू नये तो योग्य किमतीत खरेदी करावा जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या कामाचं योग्य मोल मिळेल असा विचार एबीपी माझा चे बीड जिल्हा प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी मांडला या कार्यक्रमाची प्रास्ताविक ह भ प श्यामसुंदर महाराज सौन्नर यांनी केले. 14 गावच्या संयोजन समितीने पुढाकार घेऊन हा कीर्तन महोत्सव सुरू केलेला आहे त्यावेळी पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक व महिला उपस्थित होत्या. नऊ मार्च पर्यंत हा कीर्तन महोत्सव चालणार असून असेच उद्बोधक कार्यक्रम कीर्तन सुरू राहणार आहेत. याचा परिसरातील शेतकऱ्यांनी, आबालवृद्ध महीला,तरुण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुल लाभ घ्यावा अशी आव्हान समन्वय समितीच्या ॲड अजय बुरांडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!