प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:औष्णिक विद्युत केंद्रात ५२ व्या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाला सुरूवात

 कामगार सुरक्षिततेला महानिर्मितीत महत्व-मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे


 औष्णिक विद्युत केंद्रात ५२ व्या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाला सुरूवात


 परळी प्रतिनिधी


कामगारांची सुरक्षितता यातच महानिर्मितीची, राज्याची व राष्ट्राची उन्नती होय, त्यामुळे कामगारांची सुरक्षिततेला महत्व देऊन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे वीज निर्मिती चे ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्वतोरी प्रयत्न करणार असे प्रतिपादन मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांनी केले ते 

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात ५२ व्या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  होते.


या वेळी सुरक्षितता अधीकारी एस बी उदार म्हणाले की, ट्रेड युनियन ह्या कामगारांमध्ये सुरक्षितता बद्दल जनजागृती व सुरक्षितता संस्कृती रुजविण्याचे मोठे माध्यम आहे.

मुख्य अभियंता भदाणे पुढे म्हणाले की, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरक्षेला सर्वोच्च प्रधान्य द्यावे. तसेच प्रसंगी सुरक्षितता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.


औ.वि.केंद्र, संच क्र ६ आणि ७ येथील प्रशासकीय  सभागृहात दि.४ रोजी  ५२ व्या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह साजरा करण्यात आली. हा सप्ताह दि ४ मार्च ते १० मार्च २०२३ पर्यंत पाळला जाणार आहे.या वेळीं सुरक्षा संबंधी मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास प्र.उपमुख्य अभियंता एच.के.अवचार, अधीक्षक अभियंता आर पी रेड्डी, अधीक्षक अभियंता एस एन बुकतारे , डी डी कोकाटे, चंद्रकांत मोराळे, डॉ. रांदड, कल्याण अधिकारी दिलीप वंजारी ,कार्यकारी अभियंता मदन पवार,सुरेश गर्जे,जगन्नाथ देशमाने तसेच डी एन देवकते, वैजनाथ चाटे ,एम एम पाटील, एच डी गिते

इतर अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी व संघटना प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर मुंडे यांनी तर आभार बंनसीद्ध मेहेत्रे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या