इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:केशवराज विद्यालया पालक मेळावा

 केशवराज विद्यालया पालक मेळावा



 लातूर दि २७ : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये केशवराज विद्यालयातील इयत्ता नववीतून दहावीत प्रवेश करणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या पालकांचा भव्य असा पालक मेळावा श्री  केशवराज माध्यमिक विद्यालयात आज दि.२७/३/२०२३ रोजी संपन्न झाला. या पालक मेळाव्यास अध्यक्ष म्हणून स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मा.श्री धनंजय तुंगीकर तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक पालक संघ उपाध्यक्षा साै.अनुराधा दगडगुंडे,स्थानिक समन्वय समिती कार्यवाह, तथा शालेय समिती अध्यक्ष,मा.श्री शैलेश कुलकर्णी, मुख्याध्यापक मा.श्री प्रदीप कुलकर्णी, दहावी प्रमुख श्री आदिनाथ कदम,दहावी सहप्रमुख श्रीमती शैलजा देशमुख यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.

     प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने या मेळाव्याची सुरुवात झाली.वर्षभराचे नियोजन कशाप्रकारे असेल याची माहिती दहावी प्रमुख श्री आदिनाथ कदम यांनी दिली.

भाषा विषयाचे  मार्गदर्शन श्रीमती वनमाला कलुरे यांनी केले.गणित - विज्ञान या विषयाची मांडणी श्री लक्ष्मीकांत बुगदे यांनी केली तर  सामाजिक शास्त्र व श्रेणी विषयाची माहिती श्री त्रिंबक कुलकर्णी यांनी दिली.पालक मनोगतातून पालकांनी शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करतांना शाळेकडून त्यांना अपेक्षित असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या. शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा साै. अनुराधा दगडगुंडे  यांनी आपल्या मनोगतात असे  म्हणाल्या, की शिक्षक व पालकांची भूमिका मित्र म्हणून  असावी.आपले नाते  दृढ करण्यासाठी आपल्या पाल्याशी  संवाद वाढवावा. पाल्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे सांगितले.

        श्री. केशवराज  माध्यमिक   विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री प्रदीप कुलकर्णी यांनी पालकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, की पालकांनी आपल्या पाल्यांच्या  क्षमतेनुसार अपेक्षा ठेवाव्यात. आपल्या  पाल्याला शिक्षणाबरोबरच सुसंस्कारांचीसुद्धा जोड मिळावी यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांकडूनही प्रयत्न व्हावेत. तसेच आगामी वर्षभर शाळेला पालकांचे सहकार्य मिळावे ही भावना व्यक्त केली. विद्यार्थी व मोबाईल या प्रश्नाविषयी पालकांना सुचविले की ' पालकांनी विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवून आजच्या काळात अत्यंत उपयुक्त असलेल्या मोबाईलचा विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी सुयोग्य वापर करावा.याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देऊन विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध करून द्यावा,पण दैनंदिन निरीक्षणातून त्याचा योग्य वापर होतो आहे का? हे सुद्धा पाहणे आवश्यक असल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यास पालकांनी करणे गरजेचे आहे.  यासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारीही पालकांनी करून घ्यावी असे आवाहन मुख्याध्यापकांनी याप्रसंगी केले.

         अध्यक्षीय समारोपात कार्यक्रमाध्यक्ष श्री धनंजय तुंगीकर यांनी 'विद्यार्थी व पालक हे दोघेही शाळेसाठी महत्त्वाचे असून पालकांनी सुद्धा नियमित शाळेच्या संपर्कात राहून शाळेतील शिक्षकांसोबत तसेच प्रशासनासोबत संवाद वाढवून आपल्या पाल्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर आपल्या पाल्याशी मैत्रीपूर्ण संवादामधून त्याच्या अडी-अडचणी,समस्या यांचा अंदाज घ्यावा, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या पाल्याच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले.

         सुमारे दोन तास चाललेल्या व सुमारे ६०० पालकांची उपस्थिती राहिलेल्या या पालक मेळाव्याचे प्रास्ताविक, परिचय व मान्यवरांचे  स्वागत  दहावी सहप्रमुख श्रीमती शैलजा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्रीमती वैशाली फुलसे यांनी केले. श्रीमती जान्हवी देशमुख यांच्या कल्याण मंत्राने  कार्यक्रमाची सांगता झाली.

       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी   विद्यासभा संयोजक तथा शाळेचे उपमुख्याध्यापक मा.श्री महेश कस्तुरे, पर्यवेक्षक श्री संदीप देशमुख, पर्यवेक्षक श्री बबन गायकवाड,पर्यवेक्षिका मा.श्रीमती अंजली निर्मळे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या