मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS:मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईलाच करा विविध दाखले देत केली ॲड.माधव जाधव यांनी मागणी

 मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईलाच करा विविध दाखले देत केली ॲड.माधव जाधव यांनी मागणी



अंबाजोगाई(प्रतिनिधी)दि.13- विदर्भातील रिद्धपुर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली.राज्य सरकारच्या या घोषणेला आता अंबाजोगाईतुन विरोध होतांना दिसत आहे.मराठवाड्यावर राज्य सरकार आणखी किती अन्याय करणार आहे असा सवाल मराठवाडा अध्यक्ष अखिल भारतीय किसान काँग्रेस तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड.माधव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केला आहे.यामध्ये त्यांनी अंबाजोगाईला का विद्यापीठ झाले पाहीजे यासाठी दाखलेही दिले आहेत.


मुकुंदराज स्वामींनी मराठी भाषेचा पहिला ग्रंथ व मराठी भाषेची पहिली ओवी विवेक सिंधू हा ग्रंथ अंबाजोगाई येथे लिहिलेला आहे.अकराव्या शतकामध्ये स्वामी मुकुंदराज यांनी अंबाजोगाई येथे समाधी घेतलेली आहे.आजही मुकुंदराज स्वामींची समाधी अंबाजोगाई येथे असून संपूर्ण महाराष्ट्रातून व देशभरातून मराठी भाषीक प्रेमी अंबाजोगाई येथे स्वामी मुकुंदराज यांच्या समाधी दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली व अंबाजोगाई हे केंद्रबिंदू त्या काळामध्ये होते.त्या स्वामी रामानंदतीर्थ यांनी मराठी भाषेची पहिली शाळा अंबाजोगाई येथे सुरुवात केली व अतिशय चांगल्या पद्धतीने आजही ती शाळा नावारुपास आलेली आहे.


स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावे आशिया खंडातील सर्वात मोठे व पहिले ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे आहे.राज्य शासनाने मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याबाबत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन करण्याबाबत शिफारस महाराष्ट्र शासनाला केलेली आहे.असे असताना या सर्व बाबींकडे महाराष्ट्र शासनाने दुर्लक्ष करून अंबाजोगाईवर पर्यायाने मराठवाड्यावरच राज्य सरकार अन्याय करत असल्याचे दिसून येत आहे.राज्य सरकारने अमरावती जिल्ह्यातील रिध्दपुर येथे स्थापन करणे बाबत घोषणा केलेली ही तात्काळ रद्द करून हे विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन करावे व सर्व मराठी भाषिकांना न्याय द्यावा अशी मागणी ॲड.माधव जाधव यांनी केली आहे.

विविध साहित्य सम्मेलनातील ठराव असतानाही राज्य सरकारने मराठी विद्यापीठ हलवले 

   दरम्यान अंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठ व्हावे यासाठी जागतिक पातळीवर व देश पातळीवर ठराव घेण्यात आले आहेत.असे असतांनाही मराठी भाषेचे विद्यापीठ हलवले गेले आहे. अमेरिकेत सॅनहोजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईला होणे बाबत ठराव मंजूर केलेला होता.यासह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,मराठवाडा साहित्य संमेलन,यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह व ग्रामीण साहित्य संमेलन यामध्ये मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाई येथे होण्याबाबत ठराव मंजूर केलेले आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....