युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फुले-आंबेडकरी दृष्टीकोनातून समोर आणने गरजेचे - प्रशांत मस्के

 छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फुले-आंबेडकरी दृष्टीकोनातून समोर आणने गरजेचे - प्रशांत मस्के





परळी प्रतिनिधी


छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फुले-आंबेडकरी दृष्टीकोनातून समोर आणने गरजेचे असल्याचे प्रतिपादन फुले आंबेडकरी अभ्यासक प्रशांत मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त परळी येथील  लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे दि १२ मार्च रोजी आयोजित साप्ताहिक बैठकीत केले. उदघाटक ए.तू. कराड हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार रानबा गायकवाड हे होते. या प्रसंगी प्रा. डॉ सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय नाट्य गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल, लोकमत समाचार चे प्रतिनिधी सय्यद अफसर, पत्रकार नितीन ढाकणे, संभाजी ब्रिगेड चे जिल्यासचिव सेवाकराम जाधव, न. प. चे अग्निशामक दलाचे दिनेश पवार आणि युवा नेते अनंत इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.फुले -आंबेडकरी दृष्टिकोन आणि कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र चित्रण या विषयावर प्रशांत मस्के पुढे म्हणाले कि छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त बहुजन समाजाचे प्रेरणा स्रोत असल्याचे महात्मा फुलेंनी वारंवार सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा तथाकथित इतिहास कार्रांनी पेरल्यामुळे बहुजन समाजाचे प्रचंड नुकसान झाले. शिवरायांचे स्वराज्य आणणे म्हणजे  समता, स्वतंत्र आणि मित्रत्व यावर आधारित सामाजिक व्यवस्थेचे पुनर्निर्माण होय. यावेळी समाजातील बुद्धिजीवी प्रदीप चव्हाण, प्रा. नरेश काळे, नर्सिंग गायकवाड, ऍड रायभोळे, महेश मुंडे, ओम शिंदे, विकास वाघमारे, नवनाथ दाणे, आकाश देवरे, पत्रकार अमोल सुरवसे, बाबा शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे यांनी केले. उपस्थितांचे आभार कपिल चींडालिया यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या