परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फुले-आंबेडकरी दृष्टीकोनातून समोर आणने गरजेचे - प्रशांत मस्के

 छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फुले-आंबेडकरी दृष्टीकोनातून समोर आणने गरजेचे - प्रशांत मस्के





परळी प्रतिनिधी


छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फुले-आंबेडकरी दृष्टीकोनातून समोर आणने गरजेचे असल्याचे प्रतिपादन फुले आंबेडकरी अभ्यासक प्रशांत मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त परळी येथील  लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे दि १२ मार्च रोजी आयोजित साप्ताहिक बैठकीत केले. उदघाटक ए.तू. कराड हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार रानबा गायकवाड हे होते. या प्रसंगी प्रा. डॉ सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय नाट्य गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल, लोकमत समाचार चे प्रतिनिधी सय्यद अफसर, पत्रकार नितीन ढाकणे, संभाजी ब्रिगेड चे जिल्यासचिव सेवाकराम जाधव, न. प. चे अग्निशामक दलाचे दिनेश पवार आणि युवा नेते अनंत इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.फुले -आंबेडकरी दृष्टिकोन आणि कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र चित्रण या विषयावर प्रशांत मस्के पुढे म्हणाले कि छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त बहुजन समाजाचे प्रेरणा स्रोत असल्याचे महात्मा फुलेंनी वारंवार सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा तथाकथित इतिहास कार्रांनी पेरल्यामुळे बहुजन समाजाचे प्रचंड नुकसान झाले. शिवरायांचे स्वराज्य आणणे म्हणजे  समता, स्वतंत्र आणि मित्रत्व यावर आधारित सामाजिक व्यवस्थेचे पुनर्निर्माण होय. यावेळी समाजातील बुद्धिजीवी प्रदीप चव्हाण, प्रा. नरेश काळे, नर्सिंग गायकवाड, ऍड रायभोळे, महेश मुंडे, ओम शिंदे, विकास वाघमारे, नवनाथ दाणे, आकाश देवरे, पत्रकार अमोल सुरवसे, बाबा शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे यांनी केले. उपस्थितांचे आभार कपिल चींडालिया यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!