प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:शेतकऱ्यांनी संघटित होत आंदोलन करावे : हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज

 शेतकऱ्यांनी संघटित होत आंदोलन करावे : हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज




परळी / प्रतिनिधी


हक्क व न्याय मागणाऱ्यांना इथल्या व्यवस्थेने नेहमीच कोरडे ओढले असल्याचा इतिहास अनादी काळापासून आहे. मात्र, आता शेतकऱ्यांनी संघटितपणे व विचारपूर्वक आंदोलन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले.परळी व धारूर तालुक्यातील 14 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत जगतगुरू संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने कान्नापूर येथील शेतकरी कीर्तन महोत्सवात आयोजित काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते.


परळी आणि धारूर तालुक्यातील कान्नापूर व आसपासच्या १४ गावांनी मिळून जगद्गुरू संत तुकाराम बीजाचे औचित्य साधत शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन कान्नापूर येथे केले होते.गुरुवार दि 9 रोजी संपन्न झालेल्या काल्याच्या कीर्तनात श्यामसुंदर महाराज म्हणाले, नैतिकता सदविचार, आचार, आत्मविश्वास, भूतदया, शेती आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श वस्तुपाठ सर्वच संतांनी आपल्या आचरणातून घालून दिलेला आहे. शेतकऱ्यांना नेते नाहीत म्हणून अनेक अडचणी आहेत. शेतकऱ्यांच्या घामाने व कष्टाने तयार केलेल्या उत्पन्नावर फक्त शेतकऱ्यांचा अधिकार आहे. शेतीतील पिकांना जो हमीभाव मिळत आहे, तो पाहता आगामी काळात शेतकऱ्यांनी आपली एक विशिष्ट नीती ठरवून शेती केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. सार्वजनिक व्यवस्थेवर सर्वांचा समान अधिकार असला पाहिजे, असे श्यामसुंदर महाराज म्हणाले.


या कीर्तन महोत्सवात मोहा, कान्नापूर, म्हातारगाव, आमला,करेवाडी, देवठाणा, मुंगी, गडदेवाडी, वाघाळा, कावळ्याची वाडी, सरफराजपूर, बोधेगाव व वंजारवाडी या चौदा गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती. प्रत्येकाने घरून येताना आणलेली भाजी-भाकरी एकत्रित करून सर्वांनी एकत्र बसून जेवणाच्या पंगती करणे, हे या कीर्तन महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. भुकेला, शेतकऱ्यांना व वारकऱ्यांना जात नसते हेच या माध्यमातून आम्हाला दाखवायचे होते, असे संयोजक कॉग्रेड अँड. अजय बुरांडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करताना सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या