MB NEWS:भारतरत्न,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहूजन समाजासाठी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वचा पुरस्कार केला-- प्रा डी जे वाघमारे

 भारतरत्न,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहूजन समाजासाठी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वचा पुरस्कार केला-- प्रा डी जे वाघमारे




 परळी, प्रतिनिधी---जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये, इतिहास संशोधक,कायदेपंडीत, समाजसुधारक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला.यावेळी भारतरत्न,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहूजन समाजासाठी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वचा पुरस्कार केला असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे. व्हि. जगतकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर कार्याचे अभ्यासक प्रमुख वक्ते , प्रा डी जे वाघमारे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य , प्रा.हरिष मुंडे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. राजू गोरे, प्रर्यवेशक प्रा. मंगला पेकामवार यांची उपस्थिती होती. कार्यकर्माचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ अर्चना चव्हाण यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर थोडक्यात आढावा घेतला. उपप्राचार्य ,प्रा हरीश मुंडे यांनी प्रमुख पाहुणे प्रा डी जे वाघमारे यांचा परिचय करून दिला. प्रमुख वक्ते प्रा डी जे वाघमारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर सखोल अभ्यासपुर्ण मांडणी केली. त्यात त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 152 देशात साजरी केली जाते. आसे सांगून डॉ आंबेडकरांनी आपल्या विविध ग्रंथसंपदेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने शैक्षणिक प्रबोधन घडवून आणण्याचा प्रयत्न चालविलेला होता. विद्यार्थी वर्गासाठी , प्राध्यापक, संशोधनाकरीता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरतात. ‘विद्यार्थ्यांनो जागृत व्हा.’ या लेखात त्यांनी शिक्षणाच्या काळातील शिक्षणाचे महत्त्व विशद केले असून विद्यार्थी जीवनात विद्यार्थी आपले कर्तव्य व जबाबदारी कशी पार पाडतात यावरच समाजाचे भवितव्य अवलंबून असते. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विश्वास होता असे सांगून  माणगाव परीषद, चवदार तळे सत्याग्रह, अश्यस्पृता , जातियता नष्ट , वंचित, उपेक्षित स्त्रियांच्या उन्नतीसाठी, तसेच महिला कामगार, गरोदर महिला, बालकामगार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले   आहेत. कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य ,डॉ जे व्हि जगतकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संशोधनपुर्ण होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राध्यापकाबाबतचे विचार व्यक्त करताना प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना आपला विषय सोप्या पद्धतीने सांगावा असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच प्राध्यापकांचे संशोधनपर लिखाण उत्कृष्ट असावे असे मत याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. अर्चना चव्हाण तर आभार स्टाफ सेक्रेटरी, प्रा. राजू गोरे यांनी मानले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !